टंकलेखनात ५० व ६० शब्द प्रति मिनिटच्या परीक्षा पुन्हा सुरू 

पूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टंकलेखन मशीनवर ३०, ४०, ५० व ६० श.प्र.मी. गतीच्या परीक्षा होत असत. मात्र, २०१५ पासून संगणकावर फक्त ३० व ४० श.प्र.मी. गतीच्या परीक्षाघेतल्या जाऊ लागल्या. परिणामी, उच्च लघुलेखनासाठी आवश्यक असलेली ५० श.प्र.मी.ची अट पूर्ण करणेच अशक्य झाले.

टंकलेखनात ५० व ६० शब्द प्रति मिनिटच्या परीक्षा पुन्हा सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील संगणक टंकलेखन (Computer typing) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सुखद बातमी दिली आहे. एकेकाळी टंकलेखन मशीनवर गाजणाऱ्या ५० व ६० शब्द प्रति मिनिट (50 and 60 words per minute) गतीच्या परीक्षा, तांत्रिक बदलाच्या लाटेत संगणक जगतातून लुप्त झाल्या होत्या. परंतु, राज्य शासनाने अखेर संगणक टंकलेखनातील त्या परीक्षा पुन्हा सुरू (Exam Try Again) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. 

बार्टी, TRTI, SARTHI, महाज्योती आणि ARTI स्पर्धा परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ

पूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टंकलेखन मशीनवर ३०, ४०, ५० व ६० श.प्र.मी. गतीच्या परीक्षा होत असत. मात्र, २०१५ पासून संगणकावर फक्त ३० व ४० श.प्र.मी. गतीच्या परीक्षाघेतल्या जाऊ लागल्या. परिणामी, उच्च लघुलेखनासाठी आवश्यक असलेली ५० श.प्र.मी.ची अट पूर्ण करणेच अशक्य झाले. गती व कौशल्य असूनही, केवळ परीक्षेच्या अभावामुळे शेकडो विद्यार्थ्यांची स्वप्ने अपूर्ण राहिली. विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी राज्य टंकलेखक संघटनेने मागील काही वर्षात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. संगणकावर उच्च गतीचे टंकलेखन साध्य होण्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला.

आधुनिक टायपिंग सॉफ्टवेअर, तांत्रिक सुधारणा आणि प्रशिक्षण पद्धतीवर सखोल अभ्यास करण्यात आला. शासन पातळीवर असंख्य बैठका घेऊन सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आले. शेवटी, या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि ५० व ६० श.प्र.मी. गतीच्या संगणक टंकलेखन परीक्षांना हिरवा कंदील मिळाला, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. डिसेंबर/जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नवीन गतीच्या परीक्षांमुळे उच्च लघुलेखन परीक्षेसाठी लागणारी पात्रता संगणकावरच पूर्ण होईल. सरकारी, न्यायालयीन, बँकिंग, औद्योगिक आणि खासगी क्षेत्रातील उच्च पदांच्या नोकऱ्यांचे दरवाजे खुलतील. विद्यार्थ्यांची गती व अचूकता लक्षणीय वाढेल. राज्यातील टंकलेखन प्रशिक्षण केंद्रांना नवे बळ मिळेल.