राज्यातील शिक्षकांची चिंता वाढली, तक्रार आल्यास ३० दिवसांत बदली

शिक्षण विभागाच्या या आदेशाने शिक्षकांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे याचे सर्वाधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत. एखाद्या शिक्षकावर गैरवर्तणुकीची तक्रार झाली, तर ३० दिवसांत त्या तक्रारीची चौकशी करून त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना द्यावा लागेल. यासंदर्भातील नुकताच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.  

राज्यातील शिक्षकांची चिंता वाढली, तक्रार आल्यास ३० दिवसांत बदली

एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

राज्यातील शिक्षकांसाठी चिंता व्यक्त करणारी आणि जबाबदारीने वागायला लावणारी बातमी समोर आली आहे. शिक्षकांबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नेहमीच होत असतात. मात्र, अनेक तक्रारींची चौकशीच लवकर (Complaints will be investigated fast) होत नसल्याने संबंधित शिक्षकावर कारवाई होण्यासाठी वर्षानुवर्षांचा काळ लोटतो. परिणामी, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशांना वेळेवर न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करण्यात येत असते. मात्र, आता राज्य सरकार प्राथमिक शिक्षकांची (State Govt Primary Teachers) तक्रार झाल्यास ३० दिवसांच्या आत चौकशी करून बदलीचा (Transfer after investigation within 30 days) प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवावा लागणार आहे. 

शिक्षण विभागाच्या या आदेशाने शिक्षकांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे याचे सर्वाधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत. एखाद्या शिक्षकावर गैरवर्तणुकीची तक्रार झाली, तर ३० दिवसांत त्या तक्रारीची चौकशी करून त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना द्यावा लागेल. यासंदर्भातील नुकताच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.  

कोणत्याही जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाविरोधात गैरवर्तणुकीची तक्रार झाली, तर मुख्य कार्यकारी अधिकरी त्या तक्रारीची चौकशी करतील. तक्रारीतील तथ्य आणि गांभीर्य पाहून संबंधित शिक्षकाला त्या पदावर ठेवणे योग्य आहे की नाही यावर आपला अभिप्राय देतील. जर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे मत नकारात्मक असेल, तर त्या शिक्षकाला त्या पदावर ठेवणे योग्य नसेल असे ते लेखी कारणासह नमूद करतील. त्यानंतर ते संबंधित शिक्षकाच्या बदलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवतील.