शिक्षक भरतीची मोठी अपडेट; तब्बल 10 हजार शिक्षकांची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या TAIT परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड यादी येत्या २० मे पर्यंत लावण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पात्र असून देखील मागील दोन वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांना आता दिलासा मिळणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत (School Education Department) राबवण्यात येणाऱ्या शिक्षक भरती (Teacher Recruitment) संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council) २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या TAIT परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड यादी (Selection list of eligible candidates) येत्या २० मे पर्यंत लावण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पात्र असून देखील मागील दोन वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांना आता दिलासा मिळणार आहे.
राज्य शासनाच्या जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शाळांमधील एकूण १० दहा हजार ३८८ जागा तर पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणाऱ आहे. त्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या १११ शाळांतील १ हजार ९७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. येत्या 20 मे पर्यंत मुलाखती विना भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर खाजगी शाळांमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण करून त्याची अंतिम नियुक्ती यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे शैक्षणिक २०२५-२६ सुरू होण्यापूर्वी नवीन शिक्षक शाळेवर सुरू करण्याचा शासनाचा मानस असल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सध्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत १० मे पर्यंत देण्यात आली होती. मात्र आता अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता उमेदवार १४ मे पर्यंत अर्ज करू शकणार असून ऑनलाईन आवेदनशुल्क भरण्याची मुदत देखील १४ मे रोजी रात्री ११.५९ पर्यंत असणार आहे.
यंदा डी.एड, बी. एड आणि एम. एड या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे किंवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस पात्र (Student Eligibility) असणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दि. ०५/०५/२०२५ पूर्वी आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना सदर सुधारित तरतूदीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी पुनःश्च ऑनलाईन आवेदनपत्र भरावे. पुनःश्च भरलेले ऑनलाईन आवेदनपत्र अंतिम समजून पहिले आवेदनपत्र रद्द करण्यात येईल असेही परिषदेमार्फत सांगण्यात आले आहे.