विद्यार्थीच करणार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन

मूल्यमापनाची पद्धत यंदाच्या जूनपासून राज्यभरात इयत्ता पहिलीपासून सर्व शाळांमध्ये लागू होणार आहे. यासाठी जिल्हा, तालुकानिहाय खास प्रशिक्षण देण्यात येणार असून ते २ जून ते १५ जून दरम्यान होईल.

विद्यार्थीच करणार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नव्या शैक्षणिक धोरणानुसार, (new education policy) मूल्यांकनाची नवीन पद्धत स्पष्ट करण्यात आली असून यापूर्वी फक्त शिक्षकच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करत होते. मात्र, आता मूल्यमापनाची पद्धत बदलणार आहे. वर्गातील एकाच बाकावर बसणारे विद्यार्थी एकमेकांचे मूल्यमापन करणार (Students will evaluate each other.) आहेत. 

विशेष म्हणजे, यामध्ये आता पालकांचाही समावेश (Including parents) असणार आहे. आणि त्यानंतर शिक्षक मूल्यमापन करतील. ही मूल्यमापनाची पद्धत यंदाच्या जूनपासून राज्यभरात इयत्ता पहिलीपासून सर्व शाळांमध्ये लागू होणार आहे. यासाठी जिल्हा, तालुकानिहाय खास प्रशिक्षण देण्यात येणार असून ते २ जून ते १५ जून दरम्यान होईल. 

नव्या शैक्षणिक धोरणानुसार,  मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी पाहिली जाणार असून त्यांची अध्ययन निष्पत्ती विचारात घेतली जाणार आहे. शाळा आधारित मूल्यांकनही केले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मूल्यमापन आणि कुशाग्र बुद्धीच्या विशेष प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांना विशेष उत्तेजन दिले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये काही कमतरता आहे, ती कमतरता दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

दरम्यान, नव्या पद्धतीचे मूल्यांकन कसे करावे, याबाबत २ जूनपासून जिल्हा आणि तालुकानिहाय तज्ज्ञ प्रशिक्षक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.