SPPU विद्यापीठाचे NIRF रँकिंग वाङ्‌मय चौर्यामुळे घसरले; रँकिंग उंचावणे शक्य:डॉ. नितीन करमळकर

विद्यापीठात प्राध्यापकांची संख्या कमी आहे, अशी ओरड केली जाते. मात्र, ही संख्या वाढवता येऊ शकते. त्यासाठी डिस्टिंगविश प्रोफेसर, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस अशा पर्यायांचा विचार करता येऊ शकतो. त्यामुळे दोषारोप न करता मांडणीमध्ये आपण कुठे कमी पडतो आहोत का? याचा विचार केला पाहिजे.

SPPU विद्यापीठाचे NIRF रँकिंग वाङ्‌मय चौर्यामुळे घसरले; रँकिंग उंचावणे शक्य:डॉ. नितीन करमळकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल इन्स्टिटयूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या (NIRF)निकषामध्ये काही बदल करण्यात आले असून संशोधनाच्या दृष्टीने रिट्रक्शन ही वेगळी बाब विचारात घेण्यात आली आहे.त्याचाच फटका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंगवर (Savitribai Phule Pune University Ranking) बसला आहे. सुमारे महिन्यायाभरपूर्वी  नेचरमध्ये एक आर्टिकल आले होते. त्यात आपल्या विद्यापीठाच्या रिसर्चच्या दर्जाबाबत उल्लेख होता. 500 रिसर्च पेपर पैकी तब्बल 495 रिसर्च पेपर हे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचे होते.त्यात वाङ्‌मय चौर्य (plagiarism)असल्याचे आढळून आले.या रिसर्च पेपरमध्ये विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख होता. त्यांच्या निगेटिव्ह मार्किंगचा विद्यापीठाच्या रँकिंगला बसला. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या सदस्यांनी ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी, तसेच घसरलेल्या रँकिंगवर दोषारोप करता येईल, पण त्याची कारणामिमांसा झाली पाहिजे. सध्या रँकिंग कमी झाले असले तरी त्यात निश्चितच वाढ करता येऊ शकते,असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर (Former Vice Chancellor of Savitribai Phule Pune University Dr. Nitin Karmalkar)यांनी बुधवारी व्यक्त केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने NIRF विषयावरील चर्चासत्रात डॉ.नितीन करमळकर बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे माजी प्र- कूलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, एम.फुक्टोचे अध्यक्ष डॉ. एस. पी. लवांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.डी.बी.पवार उपस्थित होते.त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य व माजी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, आजी माजी अधिसभा सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. करमळकर म्हणाले, विद्यापीठात प्राध्यापकांची संख्या कमी आहे, अशी ओरड केली जाते. मात्र, ही संख्या वाढवता येऊ शकते. त्यासाठी डिस्टिंगविश प्रोफेसर, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस अशा पर्यायांचा विचार करता येऊ शकतो. त्यामुळे दोषारोप न करता मांडणीमध्ये आपण कुठे कमी पडतो आहोत का? यांचा विचार केला पाहिजे. खासगी विद्यापीठांचे रँकिंग वर दिसते. मात्र, त्यांनी डेटा मांडण्याची योग्य पध्दती आत्मसात केली आहे. त्यामुळे आपल्याला उपलब्ध डेटा बरोबर खेळता आले पाहिजे.त्यामुळे डेटा मांडणे हे महत्त्वाचे असते. आपण कुठे कमी पडतो, यांचा अभ्यास वर्षभर केला पाहिजे. त्याचप्रमाणे परसेप्शनमध्ये आपण कमी पडत आहोत. अभ्यासक्रमामध्ये काय बदल करावे लागतील. कोणते अभ्यासक्रम कालबाह्य झाले आहेत, यांचाही अभ्यास झाला पाहीजे.खासगी विद्यापीठाशी आपण कुठे स्पर्धा करू शकतो, यांचा अभ्यास करायला हवा. इंडस्ट्रीची फुटप्रिंट कॅम्पसवर किती आहे, यांचाही गांभीर्याने अभ्यास केला पाहिजे.तसेच अशाच प्रकारचे विचारमंथन विद्यापीठाच्या कॅम्पसवर व्हावे,अशी अपेक्षा डॉ. करमळकर यांनी व्यक्त केली. 

डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, रँकिंग ही केवळ विद्यापीठाचे कुलगुरू व प्र - कुलगुरू यांची एकट्याची जबाबदारी नाही तर सामूहिक जबाबदारी आहे. आमच्या संस्थेने ऑटोनॉमस कॉलेजचा पर्याय स्वीकारला.मात्र, आम्ही आजही विद्यापीठाशी संलग्न आहोत. विद्यापीठात ज्या घटना घडतात त्याचे परिणाम महाविद्यालयांवर होतात. ९१ क्रमांकावर आल्याने त्याचे गंभीर परिणाम झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या रोजगार आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर त्याचे परिणाम होणार आहे. आत्ताच अनुदानित अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.शुल्क जास्त असूनही खासगी विद्यापीठात प्रवेश अधिक होत आहेत. NIRF बाबत प्राध्यापकांमध्ये उदासीनता आहे. ही उदासीनता कमी करण्यासाठी हे चर्चासत्र घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. एनईपीमुळे विद्यार्थी शिक्षक याचे गुणोत्तर कमी झाले आहे.ते वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

डॉ. एन. एस. उमराणी यांनी रँकिंगविषयी कारणमिमंसा केली. तसेच एनआयआरएफ रँकिंगबाबतमुळे निर्माण झालेल्या डेटाचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. श्यामकांत देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.