अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ राष्ट्रीय परिषद : समकालीन संशोधनाने अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करा - डॉ. पराग काळकर

‘अजिंक्य  डी. वाय. पाटील विद्यापीठा’चे अध्यक्ष, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील  उपाध्यक्ष तथा  ‘डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट’ चे संचालक, प्रा. (डॉ.) एकनाथ बी .खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद संपन्न झाली.

अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ राष्ट्रीय परिषद : समकालीन संशोधनाने अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करा - डॉ. पराग काळकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केवळ सैद्धांतिक चौकटींपुरते मर्यादित न राहता, समकालीन संशोधनाने अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्यासाठी 'डेटा-आधारित अंतर्दृष्टी' , डिजिटल साधने आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील पडताळणी यांचा आपल्या कार्यात समावेश केला पाहिजे.,असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.

अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठातील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने उत्कर्ष  “अत्याधुनिक संशोधन आणि नवोपक्रम” या विषयावर आधारित, दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील परिषदचे आयोजन केले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने घेण्यात आली.‘अजिंक्य  डी. वाय. पाटील विद्यापीठा’चे अध्यक्ष, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील  उपाध्यक्ष तथा  ‘डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट’ चे संचालक, प्रा. (डॉ.) एकनाथ बी .खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद संपन्न झाली.यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर बोलत होते. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे (छत्रपती संभाजीनगर) प्र-कुलगुरू, प्रा. (डॉ.) वाल्मिक सरवदे आणि ‘लँगबस्टेक युनिव्हर्सिटी इंक., न्यू जर्सी, अमेरिका’चे अध्यक्ष व कुलपती, प्रा. (डॉ.) रिपू ​​रंजन सिन्हा आदी ममयवर उपस्थित होते. या परिषदेत 

डॉ. पराग काळकर म्हणाले, डिजिटल युगातील संशोधन आणि नाविन्यपूर्णतेच्या (इनोव्हेशनच्या) अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. संशोधनाने नेहमीच व्यवहारिक उपयुक्ततेचे ध्येय बाळगले पाहिजे,  डिजिटल युगातील संशोधनाने आता अधिकाधिक व्यावहारिक आणि प्रत्यक्ष जगाशी संबंधित उपयोगांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे; जेणेकरून सामाजिक, औद्योगिक आणि तांत्रिक आव्हानांवर थेट उपाय शोधता येतील. 

डॉ वाल्मिक सरवदे म्हणाले कि,विद्यापीठे आणि उद्योगांमधील मजबूत भागीदारी नवोपक्रमाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते,   अशा सहकार्यांमुळे शेवटी रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होतात, कारण विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील आव्हाने आणि उद्योगाशी संबंधित कौशल्ये अनुभवायला मिळतात.

प्रा. (डॉ.) एकनाथ खेडकर म्हणाले , डिजिटल युगात नवोपक्रम-चालित संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी जलद तांत्रिक प्रगती विविध क्षेत्रांमध्ये कशी परिवर्तन घडवत आहे यावर प्रकाश टाकला आणि आजच्या डिजिटल जगात उदयोन्मुख आव्हाने आणि संधींना तोंड देण्यासाठी संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांनी सर्जनशील, दूरगामी विचारसरणीचा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज असल्याचे सांगितले.

यावेळी बाबू बनारसी दास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शर्मा, एनसबी बंगलोर विद्यापीठाचे श्याम शुक्ला, पंजाब पतियाला विद्यापीठाचे डॉ राजविंदर सिंग, महर्षी दयानंद विद्यापीठाचे डॉ दलबीर कौशिक, डॉ चिन्नप्पा (हैदराबाद),डॉ उमेश राव, गोव्यातील सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे डॉ फिलिप रोड्रीग्ज ई मेलो, पुणे विद्यापीठातील संघटनात्मक व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ धनंजय मंडलिक, पुणे विद्यापीठातील विपणन व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ विनोद मालकर, पुणे विद्यापीठातील वित्तीय व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष डॉ भारत कासार, लँगबस्टेक युनिव्हर्सिटी इंक, न्यू जर्सी, प्र कुलगुरू डॉ कुलदीप चरक यांनी मार्गदर्शन केले .
 यावेळी  संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांनी ४८ संशोधन शोधनिबंध सादर केले.

परिषदेचे निमंत्रक डॉ. गणेश लांडे, डॉ. आशुतोष खेडकर, डॉ. सुमित बनकर आणि डॉ. चेतन सरवदे, डॉ. चेतन खेडकर यांनी या परिषद यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप डॉ. गणेश लांडे यांनी आभार मानले.