महत्त्वाची अपडेट! फॉर्म क्र. १७ भरून १०वी, १२वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया
ज्या विद्यार्थ्यांना शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात नियमित प्रवेश न घेता दहावी किंवा बारावी बोर्डाची परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी फॉर्म क्र. १७ भरण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Education Board) खाजगी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात नियमित प्रवेश न घेता दहावी किंवा बारावी बोर्डाची परीक्षा (SSC or HSC Board Examinations) द्यायची आहे, त्यांच्यासाठी फॉर्म क्र. १७ भरण्याची प्रक्रिया (Filling Form No. 17) आता पूर्णपणे ऑनलाइन (Completely Online Process) करण्यात आली आहे.
पूर्वी ही नोंदणी ऑफलाइन फॉर्म भरून करावी लागत असे. मात्र, आता बोर्डाने प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी संपूर्ण नोंदणी mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन केली आहे.
विद्यार्थ्यांना नावनोंदणी शुल्क देखील ऑनलाइन पद्धतीने (UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग) भरावा लागणार आहे. जून-जुलै २०२६ परीक्षेसाठी खासगी नोंदणीमंडळाने निर्धारित मुदतीत नियमित नोंदणी न झालेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून जून-जुलै २०२६ मधील खाजगी परीक्षेसाठी फॉर्म क्र. १७ द्वारे विशेष नोंदणीची संधी दिली आहे. ही परीक्षा सामान्यतः जून-जुलै महिन्यात
अशी करा ऑनलाइन नोंदणी
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mahahsscboard.in या संकेतस्थळावर जावे. Student Corner किंवा Form 17 (SSC) / Form 17 (HSC) पर्याय निवडा. सविस्तर सूचना PDF डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचा. आवश्यक माहिती भरा – सध्याचा पत्ता, जिल्हा, माध्यम (मराठी/इंग्रजी/उर्दू इ.), शाखा (विज्ञान/कला/वाणिज्य). उपलब्ध शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दाखवली जाईल. त्यातून एक केंद्र निवडावे लागेल.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा (आधार कार्ड, फोटो, शाळा सोडल्याचा दाखला इ.). शुल्क ऑनलाइन भरा आणि अर्ज सबमिट करा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना जून-जुलै २०२६ च्या परीक्षेला बसता येईल. बोर्डाने यासाठी मार्गदर्शक पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे.दरम्यान, त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.