कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले, दहावी, बारावीच्या निकालावर थेट परिणाम होणार?
आंदोलनावर तोडगा न निघाल्यास निकालाचे काम रखडण्या10th and 12th Exam Resultsची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने विरोध त्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील लाखो पालक आणि विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Secondary and Higher Secondary Education Board) दहावी, बारावी परीक्षेचा निकाल (10th and 12th Exam Results) कधी लागणार याच्या प्रतीक्षेत असतानाच आता निकालाबाबतची महत्त्वाची अपडेट (Important Update) समोर आली आहे. यंदा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण नागपूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २८ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा (Work Stoppage Protest) इशारा दिला आहे. त्याचा फटका दहावी, बारावीच्या निकालाला बसण्याची शक्यता आहे.
शिक्षण मंडळाची बढती आणि बदली 2 वर्षांवरुन ४ ते ६ वर्षांवर नेल्याने कर्मचारी संतप्त असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनावर तोडगा न निघाल्यास निकालाचे काम रखडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने विरोध त्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास निकाल प्रक्रिया पूर्णपणे रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेगाने सुरू असताना, कर्मचाऱ्यांच्या कामबंदमुळे संपूर्ण प्रक्रिया ठप्प पडू शकते. यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षण, कॉलेज प्रवेश, अभ्यासक्रम निवड आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर मोठा परिणाम होणार आहे.
शिक्षण मंडळ आणि शासनाने यावर तातडीने चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आता पालक-विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. निकालाच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे यंदा गेल्या वर्षांच्या तुलनेत निकालात लक्षणीय उशीर होण्याची दाट शक्यता आहे.