दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक देणे सक्तीचे; दिव्यांग मंत्रालयाचा निर्णय
दिव्यांग उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने हे निर्देश दिले आहेत. परीक्षा केंद्र शक्यतो तळमजल्यावर ठेवण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. प्रामुख्याने लिहिण्यास अडथळा असलेल्या किंवा लिहिण्याची गती कमी असलेल्या दिव्यांग उमेदवारांना लेखनिक अथवा सहायक देण्यात येईल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये दिव्यांग उमेदवारांना (Disabled students) सोयीसुविधा नाकारल्याच्या तक्रारींना गांभीर्याने घेत, राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने (Disability Welfare Department) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवीन सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणत्याही दिव्यांग उमेदवाराने मागणी केल्यास संबंधित परीक्षा यंत्रणेला लेखनिक, वाचक किंवा प्रयोगशाळा सहायक उपलब्ध करून देणे आता बंधनकारक (Mandatory provision of writing materials to disabled students) राहील.
दिव्यांग उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने हे निर्देश दिले आहेत. परीक्षा केंद्र शक्यतो तळमजल्यावर ठेवण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. प्रामुख्याने लिहिण्यास अडथळा असलेल्या किंवा लिहिण्याची गती कमी असलेल्या दिव्यांग उमेदवारांना लेखनिक अथवा सहायक देण्यात येईल. नवीन आदेशानुसार, उमेदवार स्वतःचा लेखनिक आणू शकतो किंवा परीक्षा आयोजक त्याची व्यवस्था करतील. लेखनिकाची शैक्षणिक पात्रता उमेदवाराच्या पात्रतेपेक्षा कमी असावी, जेणेकरून निष्पक्षता राखली जाईल. तसेच अतिरिक्त वेळही मिळेल.
परीक्षा केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय आणि सहायक कर्मचारी उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. प्रवेशद्वाराजवळ बसण्याची सोय करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. दृष्टिहीन, न्यूनदृष्टी, शारीरिक हालचालींमध्ये अडचण असलेले, सेरेब्रल पाल्सी, डिस्लेक्सिया आणि ऑटिझम ग्रस्त उमेदवारांना या सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. लेखनिकाची मदत घेतल्यास, उत्तरपत्रिकेवर त्याचे नाव व स्वाक्षरी नमूद करणे बंधनकारक आहे. दरम्यान, दिव्यांगत्व असलेल्या परीक्षार्थ्यांना लेखनिक वा सहायक मिळवण्यासाठी वेगळे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, असेही आदेशात स्पष्ट आहे.