दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये तब्बल १२ वर्षाने भरीव वाढ; कॅबिनेटमध्ये निर्णय 

दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजना ३४ वर्षे जुन्या आहेत. या योजनांमध्ये कालानुरूप बदल करणे आवश्यक असल्याने तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मध्ये दिव्यांगांना सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक लाभ देण्याची तरतूद आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये तब्बल १२ वर्षाने भरीव वाढ; कॅबिनेटमध्ये निर्णय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (Disabled students) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ (Increase in scholarships) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting Decisions) घेण्यात आला. या निर्णयामुळे शिशुवर्ग ते आठवी, नववी ते दहावी तसेच अकरावी व बारावीत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरीव वाढ होणार आहे.

दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजना ३४ वर्षे जुन्या आहेत. या योजनांमध्ये कालानुरूप बदल करणे आवश्यक असल्याने तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मध्ये दिव्यांगांना सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक लाभ देण्याची तरतूद आहे. त्यानुसार दिव्यांगत्वाच्या शिष्यवृती रकमेत तब्बल १२ वर्षाने मोठी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

दिव्यांग शिष्यवृत्ती अंतर्गत सर्व २१ प्रकारातील शिशुवर्ग ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये, नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ८०० रूपये (निवासी), ६०० रूपये (अनिवासी), अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १००० रूपये (निवासी), ८०० रूपये (अनिवासी) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा १०० ते २०० रूपयांच्या दरम्यान होती. त्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ मानली जात आहे.

याशिवाय अकरावी व बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क तसेच अंध विद्यार्थ्यांसाठी दरमहा १५० रूपये वाचक भत्ता आणि दरवर्षी प्रत्यक्ष खर्चाच्या मर्यादित १५०० रूपये अभ्यास दौऱ्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. बैठकीत या योजनेसाठी अपेक्षित २३ कोटी ११ लाख रूपयांच्या आवर्ती तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.