पीएसआय पदासाठी परीक्षार्थींना १ वर्ष वयोमर्यादेत सवलत द्या; धनंजय मुंडे यांची मागणी
अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी इच्छुक परीक्षार्थींना एक वर्ष वयाची सवलत देण्यात यावी किंवा त्यानुसार वयोमर्यादा ग्राह्य धरण्याच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) वतीने घेण्यात येणाऱ्या अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी (Police Sub-Inspector Post Exam) दि. २९ जुलै, २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यासाठी परीक्षार्थींची वयोमर्यादा ग्राह्य धरण्यासाठी दि. ०१ नोव्हेंबर, २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. सदर जाहिरात नियमित प्रघाताप्रमाणे अपेक्षित वेळेच्या ७ महिने उशिरा प्रसिद्ध झाली असून, वयोमर्यादा ग्राह्य धरण्यास दिलेल्या तारखेमुळे सदर परीक्षेस अनेक परीक्षार्थी वयोमर्यादा ओलांडल्याने अपात्र ठरत आहेत. त्यामुळे संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षार्थींना १ वर्ष वय सवलत (1 year age relaxation for examinees) देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून केली आहे.
हेही वाचा - सहा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर कृषी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठीच्या जाहिरातीसाठीअपेक्षित वेळेच्या ७ महिने उशिरा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे वयोमर्यादा ग्राह्य धरण्यास दिलेल्या तारखेमुळे सदर परीक्षेस अनेक परीक्षार्थी वयोमर्यादा ओलांडल्याने अपात्र ठरत आहेत. यापूर्वी मागील वर्षी अशाच स्वरूपाची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने राज्य शासनाने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून उमेदवारांना एक वर्षाची सवलत प्रदान केली होती. तसेच याच वर्षीच्या पोलिस शिपाई भरतीमध्ये सुद्धा वय सवलत देण्यात आली होती.
ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी इच्छुक परीक्षार्थींना एक वर्ष वयाची सवलत देण्यात यावी किंवा त्यानुसार वयोमर्यादा ग्राह्य धरण्याच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.