सहा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर कृषी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
राज्यसेवा, वनसेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवांच्या मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर होऊन मुलाखतीदेखील पूर्ण होऊन तात्पुरता निवड याद्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र, कृषी सेवेची परीक्षेनंतर सहा महिने निकाल जाहीर होत नसल्याने राज्यभरातील उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
एज्युवार्ता न्यूज नेवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) घेण्यात आलेल्या कृषीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली. आयोगामार्फत महराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा (Maharashtra Agricultural Services Main Exam 2024) निकाल जाहीर (Results announced) करण्यात आला आहे. त्यात एकूण ८२७ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी ५२० उमेदवार पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची अधिकृत माहिती दिली आहे. कृषी सेवा संवर्गातील एकूण ८२८ पदांसाठी १ डिसेंबर २०२४ रोजी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर १८ मे २०२५ रोजी कृषी सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत विद्यार्थी या निकालाची अतुरतेने वाट पाहात होते. अखेर, एमपीएससीकडून मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा - सीईटी सेलकडून सूचना: अर्ज भरण्यासाठी'अपार ID' बंधणकारक
राज्यसेवा, वनसेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवांच्या मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर होऊन मुलाखतीदेखील पूर्ण होऊन तात्पुरता निवड याद्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र, कृषी सेवेची परीक्षेनंतर सहा महिने निकाल जाहीर होत नसल्याने राज्यभरातील उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या अर्जातील माहिती खरी समजून मुलाखतीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलवण्यात येत आहे.
उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.