तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शाळांकडे, शाळांच्या 50 मीटरपर्यंत जंक फूड विकणाऱ्यांची खैर नाही

शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकणाऱ्या दुकानांनाही आता अन्न सुरक्षेचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. प्रत्येक शाळेत अन्न सुरक्षा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कॅन्टीन अधिक स्वच्छ, आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित बनवण्यावर भर देण्यात येत आहे.

तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शाळांकडे, शाळांच्या 50 मीटरपर्यंत जंक फूड विकणाऱ्यांची खैर नाही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी गेल्या दोन महिन्यांपासून विविध क्षेत्रांत कडक कारवाई (Warning of strict action) केल्यानंतर आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष (Focus on students' health) केंद्रित केले आहे. महाराष्ट्रातील शाळा, वसतिगृह, कॅन्टीन आणि अंगणवाड्यांमध्ये अन्न पुरवठा करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना FSSAI परवाना अनिवार्य (FSSAI license mandatory for contractors) करण्यात आला आहे. विनापरवाना अन्न पुरवठा करणाऱ्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली असून, विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पोषक आहार मिळावा हा यामागचा मुख्य हेतू आहे. शाळा परिसराच्या ५० मीटर अंतरापर्यंत जंक फूड (Junk food) विकणाऱ्यांना देखील सावध भूमिका घ्यावी लागेल.

शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. २२ महिन्यांच्या बालकांपासून ते १२ वीपर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता सुधारून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे.

शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकणाऱ्या दुकानांनाही आता अन्न सुरक्षेचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. प्रत्येक शाळेत अन्न सुरक्षा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कॅन्टीन अधिक स्वच्छ, आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित बनवण्यावर भर देण्यात येत आहे. शाळाप्रमुखांना नियम पालनाची मुख्य जबाबदारी देण्यात आली आहे.शाळांमध्ये अन्न गुणवत्ता तपासण्यासाठी नोडल अधिकारी आणि सुपरवायझर नेमले जाणार आहेत. वर्षातून किमान दोन वेळा नियमित तपासणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि दंडात्मक उपाय योजले जातील. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांना देखील माहिती दिली जाईल.

या उपक्रमामुळे राज्यातील तब्बल २ कोटी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे. भेसळयुक्त आणि अपुर्‍या दर्जाच्या अन्नावर आळा बसल्याने विद्यार्थ्यांची शारीरिक वाढ, एकाग्रता आणि शैक्षणिक कामगिरी सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तुकाराम मुंढे यांच्या या धाडसी पावलाने शैक्षणिक क्षेत्रात आरोग्य जागरूकतेची नवी सुरुवात झाली आहे.