राज्यात पाच महिन्यांत ८८ हजार युवकांना रोजगार; मंत्री लोढा यांची माहिती

महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे लोढा यांनी सांगितले.

राज्यात पाच महिन्यांत ८८ हजार युवकांना रोजगार; मंत्री लोढा यांची माहिती
Minister Mangal Prabhat Lodha

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कौशल्य (Skill), रोजगार (Employment), उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये जानेवारी ते ३१ मे अखेर ८८ हजार १०८ नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिली.

महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे लोढा यांनी सांगितले. बेरोजगार उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

शालेय साहित्य महागल्याने खासदार सुप्रिया सुळे यांची नाराजी; केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली महत्वाची मागणी

विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख ४ हजार ६९५ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयम् वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर विभागाकडे ६१ लाख ०६ हजार ५८ इतक्या उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात १० लाख ३७ हजार ७४७, नाशिक विभागात ९ लाख ४७ हजार ७८६, अमरावती विभागात ६ लाख ३५ हजार ९२०,औरंगाबाद विभागात १२ लाख ०५ हजार ६८७, नागपूर विभागात  ८ लाख ५१ हजार ३०१ पुणे विभागात १४ लाख २७ हजार ६१७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक; उरले फक्त २७ दिवस

माहे जानेवारी ते  ३१ मे २०२३ अखेर कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे यात मुंबई विभागात २३ हजार ६३४, नाशिक विभागात १४ हजार २११, अमरावती विभागात ३ हजार ३६७,औरंगाबाद विभागात १७ हजार ४५१, नागपूर विभागात  १ हजार १६५ ,पुणे विभागात २८ हजार २८० बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo