शिक्षकांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका, एक दिवसात प्रश्न मार्गी लावा: आझाद मैदानावर शरद पवार

गेल्या 56 वर्षांपासून मी विधानसभा, लोकसभा, राज्यसभेमध्ये काम केलं असून निधीची तरतूद कशी करायची मला माहित असल्याचे सांगत महायुती सरकारला शरद पवार यांनी खडेबोल सुनावले. विविध मागण्यासाठी 5 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून समर्थन दिले जात आहे.

शिक्षकांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका, एक दिवसात प्रश्न मार्गी लावा:  आझाद मैदानावर शरद पवार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

टप्पा अनुदान मागणीसाठी (Stage grant demand) राज्यातील विनाअनुदानित शाळेतील (Unaided school teacher) हजारो शिक्षकांचे गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर (Mumbai Azad Maidan Movement) आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर काल खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी आंदोलक शिक्षकांची (Protesting teacher) भेट घेतल्यानंतर आज दस्तूरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar Meet Protesting teacher) यांनी आंदोलन स्थळीभेट देत शिक्षकांचे मनोबल उंचावले. ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर अशा पद्धतीने संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, एका दिवसात प्रश्न मार्गी लावा, असे आवाहन यावेळी शरद पवार यांनी सरकारला केले.

बी.ई./बी.टेक, एमबीए/एमएमएस अभ्यासक्रम प्रवेशास मुदतवाढ

गेल्या 56 वर्षांपासून मी विधानसभा, लोकसभा, राज्यसभेमध्ये काम केलं असून निधीची तरतूद कशी करायची मला माहित असल्याचे सांगत महायुती सरकारला शरद पवार यांनी खडेबोल सुनावले. विविध मागण्यासाठी 5 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून समर्थन दिले जात आहे.

आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या शिक्षकांना शरद पावार, नीलेश लंके,रोहित पवार यांची भेट

शिक्षकांच्या मागण्या रास्त आहेत. त्यासाठी त्यांना संघर्ष करण्याची वेळ येत आहे. शिक्षक आंदोलनासाठी येऊन चिखलामध्ये बसत आहेत हे बरोबर नसल्याचे शरद पवार म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं की, तरतूद न करण्यात आलेला आदेश हा कचरा टाकण्यासारखाच आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी खांद्याला खांदा लावून आपण काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांनी सरकारकडे एक दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

राज्यातील सुमारे 5 हजार खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र,  त्यानंतर 10 महिने उलटूनही अद्याप निधीची कोणतीही तरतूद सरकारने केली नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. राज्यामध्ये सध्या 5 हजार 844 अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये 820 प्राथमिक, 1 हजार 984 माध्यमिक व 3 हजार 40 उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 3 हजार 513 प्राथमिक, 2 हजार 380 माध्यमिक व 3 हजार 43 उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण 8 हजार 602 प्राथमिक शिक्षक, 24 हजार 28 माध्यमिक शिक्षक आणि 16 हजार 932 उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.