बारावीचा निकाल जाहीर; निकाल ८९.७९टक्के

विद्यार्थ्यांना 2 मे रोजी दुपारी एक निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. राज्य मंडळाने दिलेल्या खालील वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

बारावीचा निकाल जाहीर; निकाल  ८९.७९टक्के

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा राज्याचा निकाल ८९.७९. टक्के लागला आहे. यंदा निकालात 2.09 टक्के वाढ झाली आहे. दरवर्षी प्रमाणे निकालात यंदा मुलीच आघाडीवर आहेत. तसेच कोकण विभागात निकालात पहिल्या क्रमांकावर असून लातूर विभाग शेवटच्या स्थानावर आहे.

विद्यार्थ्यांना 2 मे रोजी दुपारी एक निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. राज्य मंडळाने दिलेल्या खालील वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

1.https://results.digilocker.gov.in

2.https://mahahsscboard.in

3.https://hscresult.mkcl.org

4.https://results.targetpublications.org

5.https://results.navneet.com

6.https://www.tv9marathi.com

7.https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results.

 निकालाची ठळक वैशिष्ट्ये

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,४४,७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३३,०५८ विदधार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७९ आहे.

खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३७,५५९ एवढी असून त्यापैकी ३६,९४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,६३४ विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतिची टक्केवारी ८०.२१ आहे.

 या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ५०,८७६ पुनर्परिक्षार्थी वि‌द्याथ्यर्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५०,३४६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १८,३४९ विद्यार्थी उत्तीण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३६.४४ आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ८,४४६ दिव्यांग विदयार्थ्यांनी नोंदण केली होती. त्यापैकी ८,३६७ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्या उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.५८ आहे. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याबाब कार्यवाही करण्यात आलेली आहे.

 सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९४.१४%) सर्वाधिक अस सर्वांत कमी निकाल लातूर विभागाचा (८४.१४%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केव ८६.८०% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ६.३५% ने जास्त आहे. एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १००% आहे.