नागपूर महापालिकेत २४५ जागांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
अर्ज प्रक्रिया आज 26 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून भरती प्रक्रियेत सहभागी होणारे उमेदवार अधिकृत संकेतस्थळ https://nmcnagpur.gov.in/ जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत (NMC) विविध पदांच्या 245 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया दि. 26 डिसेंबरपासून सुरू (Application process starts)करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून भरती प्रक्रियेत सहभागी होणारे उमेदवार अधिकृत संकेतस्थळ https://nmcnagpur.gov.in/ जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 36 पदे, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) - 3 पदे, परिचारिका (GNM) - 52 पदे, वृक्ष अधिकारी - 4 पदे, स्थापत्य अभियंता सहाय्यक - 150 पदे अशा एकूण 245 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी उमेदवाराने किमान वयोमर्यादा १८ वर्षे पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. तर कमाल वयोमर्यादा श्रेणीवर अवलंबून आहे. आरक्षित श्रेणींसाठी वय शिथिलता देण्यात आली आहे.
शैक्षणिक अहर्ता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंग मधील पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) पदासाठी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्समधील पदवी तर स्थापत्य अभियंता सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. वरील सर्व शिक्षण (AICTE द्वारे किंवा समतुल्य AMIE मधून झालेले असावे. परिचारिका (GNM) HSSC पदासाठी (जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी) नंतर GNM कोर्स पूर्ण असावा व नर्सिंग कौन्सिल ऑफ महाराष्ट्र मध्ये नोंदणी केलेली असावी. वृक्ष अधिकारी पदासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठातून फलोत्पादन, कृषी, वनस्पतिशास्त्र किंवा वनशास्त्र या विषयात B.Sc. केलेलेच उमेदवार भरतीसाठी पात्र असणार आहेत.
भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वसाधारण उमेदवारांना 1 हजार तर आरक्षित श्रेणी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 900 रुपये परीक्षा शुल्क भरावा लागणार आहे. या भरतीसाठी फक्त महाराष्ट्रात राहणारे उमेदवार अर्ज करू शकतात. त्यासाठी उमेदवारांना आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे. अधिक आणि तपशीलवार माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.