11th Admission : अकरावी प्रवेशाच्या अंतिम फेरीसाठी आजपासून प्रवेश सुरू

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अंतिम फेरीसाठी ७ हजार ९५९ नविन विद्यार्थी नोंदणी झाली आहे. तर ४९ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ मध्ये पसंतीक्रम भरलेला आहे. तसेच कोट्यासाठी एकूण २ हजार १९६ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम दिलेला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वा. पासून ते ३० ऑगस्ट सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयांत जाऊन आपला प्रवेश निश्चित करणसाठी कालावधी देण्यात आलेला आहे.

11th Admission : अकरावी प्रवेशाच्या अंतिम फेरीसाठी आजपासून प्रवेश सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील (11th Admission Process) अंतिम फेरीसाठी (Final round) दिनांक २६ ऑगस्ट २०२५ ते २७ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये एकूण ७ हजार ९५९ नवीन विद्यार्थी नोंदणी (7 Thousand 959 new student registrations) झाली आहे. तसेच ४९ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ मध्ये पसंतीक्रम भरलेला आहे. तसेच कोट्यासाठी एकूण २ हजार १९६ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम दिलेला आहे. वेळापत्रकाप्रमाणे अंतिम फेरीसाठी आज २९ ऑगस्टपासून अलॉटमेंट (Allotment from August 29th) विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

धक्कादायक : पाचवीतील विद्यार्थिनीचा मृतदेह शौचालयात जाळलेल्या अवस्थेत सापडला

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अंतिम फेरीसाठी ७ हजार ९५९ नविन विद्यार्थी नोंदणी झाली आहे. तर ४९ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ मध्ये पसंतीक्रम भरलेला आहे. तसेच कोट्यासाठी एकूण २ हजार १९६ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम दिलेला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वा. पासून ते ३० ऑगस्ट सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयांत जाऊन आपला प्रवेश निश्चित करणसाठी कालावधी देण्यात आलेला आहे.

शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत. राज्यातील एकूण ९ हजार ५३५ कनिष्ठ महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता २१ लाख ५९ हजार २३२ इतकी आहे. आत्तापर्यंत इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी एकूण १४ लाख ७९ हजार ६५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि एकूण १२ लाख ७८ हजार ४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.