10th supplementary exam : दहावी पुरवणी परीक्षेत १३ हजार ४७८ विद्यार्थी उत्तीर्ण ; १७ हजार ३१९ विद्यार्थ्यांना एटीकेटी
पुरवणी परीक्षेत लातूर विभागीय मंडळाचा निकाल सर्वाधिक ५१.४७ टक्के लागला आहे.तर पुणे विभागीय मंडळाचा निकाल सर्वात कमी २२.२२. टक्के लागला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education - ssc board ) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल ( 10th supplementary exam result ) २९. ८६ टक्के लागला आहे. त्यामुळे राज्यातील १३ हजार ४७८ विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी प्रवेशाची संधी प्राप्त होणार आहे.तसेच एटीकेटीची (ATKT) सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ३१९ एवढी आहे . पुरवणी परीक्षेत लातूर विभागीय मंडळाचा निकाल सर्वाधिक ५१.४७ टक्के लागला आहे. तर पुणे विभागीय मंडळाचा निकाल सर्वात कमी २२.२२. टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर ऑनालाईन निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणपत्रक डाऊनलोड करून त्यांची प्रिंट घेता येईल.विद्यार्थ्यांना गुण पडताळणी , उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत व पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
राज्य मंडळातर्फे १८ जुलै ते १ ऑगस्ट २०२३ या कालावधीत इयत्ता दहावीची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. राज्यात परीक्षे दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे काही विषयांची परीक्षा पुढे करण्यात आली होती. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळा अंतर्गत एकूण ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यातील ४५ हाजार १६६ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले. त्यामधील १३ हाजार ४७८ उत्तीर्ण झाले आहेत. राज्याची उत्तीर्णतेची टक्केवारी २९.८६.टक्के एवढी आहे. त्यातच एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ३१९ एवढी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात.
विभाग मंडळ निहाय दहावीच्या निकालाची आकडेवारी
पुणे - २२.२२
नागपूर - ४१.९०
औरंगाबाद - ३७.२५
मुंबई - १५.७५
कोल्हापूर - २९.१८
अमरावती - ४३.३७
नाशिक -४१.९०
लातूर - ५१.४७
कोकण - २७.०३