विद्यार्थ्यांनी संविधानातील नीतिमूल्यांचा आदर्श विचार पुढे न्यावा; सरन्यायाधीश
सरन्यायाधीश गवई यांनी एनबीटी विधी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च न्यायालय मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्यासह अनेक कायदे अभ्यासक मान्यवर आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
एज्युवार्त न्यूज नेटवर्क
भारतीय राज्यघटनेने (Constitution of India) नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार व संविधानाची तत्वे (Fundamental Rights and Principles of the Constitution) आपणास कायम मागदर्शक ठरली आहेत. कायद्याचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी संविधानातील नीतिमूल्ये स्वीकारून प्रत्येक नागरिकांना न्याय मिळेल यादृष्टीने दक्ष राहून वाटचाल करावी, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई (Chief Justice Bhushan Gavai) यांनी केले.
राज्यातील शिक्षकांना दिवाळी भेट, अनुदान वितरित..
सरन्यायाधीश गवई यांनी एनबीटी विधी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च न्यायालय मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्यासह अनेक कायदे अभ्यासक मान्यवर आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सरन्यायाधीश गवई म्हणाले की, संविधानाची उद्देशिका हा संविधानाचा एक भाग आहे. माझ्या शिक्षणाची सुरूवात महापालिका शाळेपासून झाली व आज या पदावर पोहचण्याचे सर्व श्रेय संविधानाचे असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी प्रगतीपथावर पोहोचलो आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली ध्येये निश्चित करावीत. उच्च ध्येय ठेवल्यास निश्चितच आपल्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल, असा सल्ला गवई यांनी विद्यार्थांना दिला.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शहीद भगतसिंग यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी वेचले. त्याप्रमाणे विधी क्षेत्रात ज्ञान संपादन करून त्याचा लाभ समाजासाठी होईल. तसेच विधीक्षेत्र व समाजाची प्रतिमा मलीन होणार नाही यादृष्टीने विद्यार्थांनी वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.