AICTE अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना देणार 50 हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती

इच्छुक विद्यार्थी १५ फेब्रुवारीपर्यंत एआयसीटीईच्या अधिकृत वेबसाइट yashasvi@aicte-india.org वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्व अर्जांची पडताळणी संस्थेकडून केली जाईल आणि एआयसीटीई स्तरावर त्यांची उलटतपासणी केली जाईल. निवडलेल्या विद्यार्थ्यांना ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे दिली जाईल.

AICTE अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना देणार 50 हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (All India Council for Technical Education) AICTE विद्यार्थ्यांसाठी “यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अँड होलिस्टिक अकादमिक स्किल्स एंटरप्राइझ इनिशिएटिव्ह (Young Achievers Scholarship and Holistic Academic Skills Enterprise Initiative) Yashasvi  स्कीम २०२५” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ५ हजार २०० विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. (Under this scheme, scholarships will be provided to 5,200 students) या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या प्रमुख शाखांमध्ये तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.

ही शिष्यवृत्ती फक्त कोर इंजिनिअरिंग शाखांमध्ये पदवी आणि पदविका अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या योजनेअंतर्गत ५ हजार २०० शिष्यवृत्ती दिल्या जातील, त्यापैकी २ हजार ५९३ पदवी विद्यार्थ्यांसाठी आणि २ हजार ६०७ डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. पदवी विद्यार्थ्यांना दरवर्षी रुपये ५० हजाराची मदत दिली जाईल आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांना दरवर्षी रुपये ३० हजारची मदत दिली जाईल. ही मदत पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त चार वर्षांसाठी आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी दिली जाईल.

इच्छुक विद्यार्थी १५ फेब्रुवारीपर्यंत एआयसीटीईच्या अधिकृत वेबसाइट yashasvi@aicte-india.org वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्व अर्जांची पडताळणी संस्थेकडून केली जाईल आणि एआयसीटीई स्तरावर त्यांची उलटतपासणी केली जाईल. निवडलेल्या विद्यार्थ्यांना ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे दिली जाईल.
विद्यार्थ्याने एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेत पदवी/पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात किंवा दुसऱ्या वर्षी लॅटरल एन्ट्रीद्वारे प्रवेश घेतलेला असावा. उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारने प्रसिद्ध केला पाहिजे. पात्रता परीक्षा आणि पदवी/पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशामधील अंतर जास्तीत जास्त दोन वर्षांचे असावे. जर विद्यार्थी राखीव प्रवर्गातील असेल आणि त्याची निवड सामान्य श्रेणीतील गुणवत्ता यादीत झाली तर त्याला/तिला फक्त सामान्य श्रेणीतच विचारात घेतले जाईल. ही शिष्यवृत्ती फक्त मुख्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी आहे. जर विद्यार्थ्याने दुसऱ्या शाखेत बदली केली तर तो शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरेल आणि त्याला संपूर्ण रक्कम परत करावी लागेल हे या शिष्यवृत्तीसाठीचे पात्रतेचे निकष आहेत.