शाळेवर होणारी अतिक्रमण कारवाई रोखण्यासाठी शिक्षिकेने केले आत्मदहन
या महिला साध्वी असून त्या 'आनंदमार्गी' संस्थेकडून शाळेची देखभाल करत होत्या. अतिक्रमणाच्या मोबदल्यात शाळेला जी नुकसान भरपाई दिली जाणार होती.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
रस्ता बांधणीसाठी शाळेच्या इमारतीवर होणारी अतिक्रमण कारवाई रोखण्यासाठी एक शिक्षिका (teacher)आपल्या जिवावर उदार झाली. झारखंड राज्यातील बोकारो (Bokaro in Jharkhand state) जिल्ह्यातील ही घटना आहे. येथील आनंदमार्गी या संस्थेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या शाळेवर रांची बोकारो फोरलेन रास्ता (Ranchi Bokaro Four Lane Road on School)बांधण्यासाठी अतिक्रमण कारवाई होत असताना शाळेतील वयोवृध्द शिक्षिकेने स्वतःला पेटवून घेतले.
या महिला साध्वी असून त्या 'आनंदमार्गी' संस्थेकडून शाळेची देखभाल करत होत्या. अतिक्रमणाच्या मोबदल्यात शाळेला जी नुकसान भरपाई दिली जाणार होती. त्यासाठी भूसंपादन विभागाकडून 20 टक्के लाच मागितल्याचा आरोप या साध्वीने केला आहे. भरपाईच्या रकमेसाठी प्रयत्न करूनही लाच न दिल्याने गेल्या एक वर्षापासून प्रकरण प्रलंबित होते.
विना परवानगी अतिक्रमण कारवाई होत असल्याचा विरोध यावेळी करण्यात येत होता. त्या दरम्यान साध्वीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि स्वतःला पेटवून घेतले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि लोकांनी दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. भूसंपादन विभागाचे अशोक कुमार यांनी लाच मागितल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी प्रशासन दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहे, परंतु, दोन गटांमधील परस्पर वर्चस्वासाठीच्या लढाईमुळे प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे.