बारावी निकालानंतर भंडाऱ्यात हृदयद्रावक घटना, नापास झाल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना अपयश ही शेवटचे नसून, नव्या संधी असल्याचे सांगितले आहे. पालकांनी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

बारावी निकालानंतर भंडाऱ्यात हृदयद्रावक घटना, नापास झाल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल (12th Grade Exam Results) नुकताच जाहीर झाला. मात्र, या निकालाच्या काही तासांनंतरच भंडारा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना (Bhandara student suicide) समोर आली आहे. तुमसर येथील १८ वर्षीय नावेद होलाराम खंडाते (Student Naved Khandate) या तरुणाने बारावी परीक्षेत नापास (Failed in 12th exam) झाल्याच्या नैराश्यातून शेतात गळफास लावून जीवन संपवले. निकाल जाहीर झाल्यानंतर तो मानसिक तणावात होता. निकाल पाहिल्यानंतर तो गावाजवळील शेतात गेला आणि तेथे त्याने टोकाचे पाऊल उचलले. कुटुंबीयांना जबर धक्का बसला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

नावेद याने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. निकालात अनुत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याच्या मनात नैराश्य निर्माण झाले. त्याने शेतात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परीक्षेचा निकाल हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षण असतो. मात्र, अपयश सहन न झाल्याने घडलेल्या या घटनेने समाजमन हेलावले आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना अपयश ही शेवटचे नसून, नव्या संधी असल्याचे सांगितले आहे. पालकांनी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. भंडारा जिल्ह्याने ८४.१२ टक्के निकालासह नागपूर विभागात पाचवे स्थान मिळवले. जिल्ह्यातील नूतन कन्या ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. गीतिका श्याम धूत हिने सर्व विषयांत १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पल्लवी सतीश बाभरे (९८.५० टक्के) जिल्ह्यात द्वितीय तर अपूर्वा गिरधारी भेलावे (९७.६७ टक्के) तृतीय स्थानावर आहेत.