दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, पोलिस पाटील पदांच्या ५५४ जागांसाठी भरती सुरू

या भरतीसाठी मुख्यतः दहावी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, पोलिस पाटील पदांच्या ५५४ जागांसाठी भरती सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने (Latur Collector Office) पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी (Police Patil Recruitment) अधिकृत जाहिरात प्रसिद्ध (Advertisement Published) केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे जिल्ह्यातील विविध गावांमधील रिक्त असलेल्या ५५४ पोलीस पाटील पदांची भरती (Recruitment for 554 Posts) करण्यात येणार आहे. सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या युवक-युवतींसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे. या भरतीसाठी मुख्यतः दहावी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया १ जून २०२६ रोजी सुरू होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२६ आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जाहिरातीत शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे, आरक्षण नियम आणि इतर महत्त्वाच्या अटी-शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत. 

लेखी परीक्षा ८० गुणांची असेल. ही परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असेल. अभ्यासक्रमात सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती आणि पोलीस पाटील पदाच्या कर्तव्यांशी संबंधित प्रश्नांचा समावेश असेल. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना २० गुणांच्या मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. एकूण १०० गुणांच्या या प्रक्रियेद्वारे योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.

पोलीस पाटील ही ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची पद आहे. गाव पातळीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा दुवा म्हणून काम करणाऱ्या या पदासाठी जबाबदारीपूर्ण आणि सक्षम उमेदवारांची अपेक्षा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना वेळेवर अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. या भरतीमुळे लातूर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट किंवा नोटिस बोर्डवर जाहिरात तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.