अभिमानास्पद! नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला स्वत:च्या मुलांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश
जिल्हाधिकारी कार्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या टोकर तलाव गावातील जिल्हा परिषद शाळेत दाखल करून एक प्रकारे आदर्श निर्माण केला. आदिवासी बहुल जिल्ह्यात जिथे शाळा आहेत, पण शिक्षक नाहीत किंवा पडक्या स्वरुपात शाळा आहेत तिथे त्यांनी आपल्या मुलांचा प्रवेश घेतला आहे. त्यामुळे हा नंदूरबार जिल्ह्यासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी मोठा संदेश देणारा निर्णय ठरला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी (Nandurbar District) मिताली सेठी (Collector Dr Mitali Sethi) यांनी अभिमानास्पद निर्णय घेतला आहे. आपल्या स्वतःच्या दोन्ही जुळ्या मुलांचा त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत (Zilla Parishad School) प्रवेश घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या टोकर तलाव गावातील जिल्हा परिषद शाळेत दाखल करून एक प्रकारे आदर्श निर्माण केला. आदिवासी बहुल जिल्ह्यात जिथे शाळा आहेत, पण शिक्षक नाहीत किंवा पडक्या स्वरुपात शाळा आहेत तिथे त्यांनी आपल्या मुलांचा प्रवेश घेतला आहे. त्यामुळे हा नंदूरबार जिल्ह्यासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी मोठा संदेश (Big message for the education sector) देणारा निर्णय ठरला आहे.
मुलांना गावातील शाळेत दाखल करून, मराठी, आदिवासी आणि इतर स्थानिक भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे. टोकर तलावसारख्या गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हा संदेश मिताली मॅडमने आपल्या कृतीतून दिला आहे. नंदुरबारसारख्या जिल्ह्यांमध्ये पोतदार व इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा उपलब्ध आहेत, तरीही त्यांनी लोकशिक्षण आणि समानतेला प्राधान्य दिले. या छोट्या निर्णयामध्ये मोठा संदेश दडलेला आहे. 'समान शाळा, समान शिक्षण प्रत्येकासाठी' मिताली मॅडमच्या या पावलावर नंदुरबार वासीयांसोबतच शिक्षण क्षेत्रातही प्रेरणा मिळाली आहे.
डॉ. मिताली सेठी या 2017 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांची पाच विविध पदांवर बदली करण्यात आली आहे. जुलै 2018 ते एप्रिल 2019 या काळात त्या अमरावतीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर जुलै 2019 ते ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी दिल्ली येथे केंद्र सरकारमध्ये असिस्टंट सेक्रेटरी पदावर काम पाहिले.
ऑक्टोबर 2019 ते जुलै 2021 या कालावधीत डॉ. सेठी धारणी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, उपाविभागीय मॅजिस्ट्रेट आणि प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत होत्या. जुलै 2021 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर जानेवारी 2023 पासून त्या वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर येथील संचालकपदी कार्यरत होत्या.