पवित्र शिक्षक भरती घोटाळा : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेची एसआयटी मार्फत चौकशी?
ही शिक्षक भरती राज्यातील सर्वात मोठी शिक्षक भरती होती. त्यामुळे या प्रक्रियेतील उमेदवार, कर्मचारी, दलाल, व उमेदवार यांना ताब्यात घेऊन तपास करावा.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज (District Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha) या शैक्षणिक संस्थेत पवित्र पोर्टलच्या (Pavitra Portal) माध्यमातून केल्या जात असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार (Major corruption in teacher recruitment process) झाला असल्याची तक्रार संजय हिरामण जाधव यांच्याकडून दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने या पवित्र पोर्टल घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी जाधव यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Education Minister Dada Bhuse) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला २६४ शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यास आदेशित केले होते. त्यातील काही तांत्रिक बाबीचा तपास केल्या शिवाय सादर भरती ला मान्यता देण्यात येऊ नये. पवित्र पोर्टलच्या नियमा नुसार ही शिक्षक भरती झाली आहे, निवडीसाठी येणाऱ्या उमेदवाराच्या पाठ व मुलाखती यांचे व्हिडिओ ऑडियो चित्रीकरण करण्यात आले नाही. तोफखाना पोलीस स्टेशन अहिल्या नगर येथे याबाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग अहील्यानगर यांनी एस. ओ.पी नुसार भरती झाली का नाही याची तपासणी सुरू केली आहे. मात्र, यातून झालेला घोटाळा उघड होणार नाही. संस्था पदाधिकारी यांनी निकालानंतर व्यवस्थित सर्व बदलले आहे. कागदपत्रं व्यवस्थित केली आहेत. पण घोटाळा करण्यासाठी पाठाचे व्हिडिओ, ऑडियो केलेले नाही. त्यामुळे भरतीत घोटाळा झाला हे सिद्ध होते,असे जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून हा २६४ शिक्षक भरती घोटाळा उघड होणार नाही. या भरतीसाठी संस्था पदाधिकारी यांनी काही कर्मचारी व खाजगी दलाल नेमले होते. त्यांनी हजारो उमेदवारांना संपर्क करून पैसे जमा केले व त्या अपात्र लोकांना नोकरीत घेतले तसा निवड अहवाल जि. प. अहिल्यानगर येथे सादर केला आहे. निवड झालेले उमेदवार, संस्था कर्मचारी नेमलेले दलाल व संस्था पदाधिकारी यांचे सायबर रेकॉर्ड तपासावे. फोन कॉल तपासावे लागतील. त्यासाठी सायबर तज्ञ यांची टीम नेमण्याची आवश्यकता आहे. संस्था कार्यालयात निवड समिती उमेदवार यांना बोलवून निकालपत्र बदलण्यात आले त्या निवड समिती सदस्य व विषय तज्ञ यांचे फोन कॉल तपासले जावेत,अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
मुलाखतीनंतर तीन दिवस संस्था कार्यालयात कोणी प्रवेश केला ते सीसीटिव्ही फुटेज मधून समजेल. त्यासाठी त्यांना ताब्यात घ्यावेत. हा घोटाळा किमान २५ कोटी रुपयाचा व हजारो पात्र उमेदवारावर अन्याय करणारा आहे तरी याची दखल घेऊन एसआयटी नेमावी व तपास करून गुन्हे दाखल करावेत.ही शिक्षक भरती राज्यातील सर्वात मोठी शिक्षक भरती होती. त्यामुळे या प्रक्रियेतील उमेदवार, कर्मचारी, दलाल, व उमेदवार यांना ताब्यात घेऊन तपास करावा. यासाठी एसआयटी नेमावी, अशी मागणी संजय जाधव यांना शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.