CBSE  : शाळा सुरू होऊन महिना संपत आला तरी पुस्तकांचा तुटवडा 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक वर्षे २०२५-२६ साठी शाळा सुरू होऊन जवळपास एक महिना होत आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांची पुस्तके अद्याप बाजारात उपलब्ध झाली नसल्याने शिक्षक नेमकं शिवतात काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

CBSE  : शाळा सुरू होऊन महिना संपत आला तरी पुस्तकांचा तुटवडा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Secondary Education) शैक्षणिक वर्षे २०२५-२६ (Academic year 2025-26) साठी शाळा सुरू होऊन जवळपास एक महिना होत आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांची पुस्तके अद्याप बाजारात उपलब्ध झाली (Shortage of books in the market) नसल्याने शिक्षक नेमकं शिवतात काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. येत्या १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. या समस्येमुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या अडचणीत आहेत. 

अनेक सीबीएसई शाळांमध्ये, विशेषत: नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला, पाठ्यपुस्तकांची उपलब्धता कमी आहे. काही ठिकाणी, विद्यार्थ्यांना पुस्तके मिळायला खूप वेळ लागतो, तर काही ठिकाणी, काही पुस्तकेच उपलब्ध नाहीत.काही पालकांनी या समस्येबद्दल शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसईला पत्र पाठवून पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. CBSE ने शाळांना विद्यार्थ्यांना विशिष्ट विक्रेत्यांकडून पुस्तके खरेदी करण्यास भाग न पडण्याची सूचना दिली आहे.

NCERT पुस्तकांचा तुटवडा विशेषतः बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये अधिक तीव्र आहे. तुटवडा प्रामुख्याने इयत्ता 6 ते 12 वीच्या पुस्तकांमध्ये दिसून येतो, विशेषतः गणित, विज्ञान आणि रसायनशास्त्र यासारख्या विषयांमध्ये. इयत्ता 3 आणि 6 साठी नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने या वर्गांसाठी पुस्तके मिळणे कठीण झाले आहे. 

शाळा सुरू होऊन जवळपास एक महिना संपत आला आहे तरी सीबीएसईचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकाविना भविष्याचे पाढे गिरवत आहेत. गेल्या महिनाभरापासून पुस्तकांचा तुटवडा कमी करण्यासाठी शासन स्तरावरून कोणतीही हालचाल होत नसल्याने पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. सद्यःस्थितीत बाजारात सीबीएसईची पहिली ते दहावीची ७० टक्के पुस्तके उपलब्ध नाहीत. यामुळे पुस्तके इंटरनेटवरून डाऊनलोड करण्याकडे कल वाढला आहे.