शाळेत विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर बंदी घालणारी मागणी न्यायालयाने फेटाळली 

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मोबाईवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर नुकतीस दिल्ली उच्चा न्यायालायात सुनावणी पार पडली. या निर्णय देताना कोर्टाने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या वाईट कृत्याला जबाबदार डिजिटल वर्तन शिकवावे. तसेच शाळांमध्ये 'मोबाइल फोनवर पूर्ण बंदी' फेटाळली असून नवीन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत.

शाळेत विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर बंदी घालणारी मागणी न्यायालयाने फेटाळली 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मोबाईवर बंदी (Ban on students' mobile phones in school) घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर नुकतीस दिल्ली उच्चा न्यायालायात (Delhi High Court) सुनावणी पार पडली. या निर्णय देताना कोर्टाने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या वाईट कृत्याला जबाबदार डिजिटल वर्तन शिकवावे. तसेच शाळांमध्ये 'मोबाइल फोनवर पूर्ण बंदी' फेटाळली (Request rejected) असून नवीन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित (New guidelines set) करण्यात आली आहेत. शाळांमध्ये स्मार्टफोनवर पूर्ण बंदी घालणे हा 'अव्यवहार्य दृष्टिकोन' आहे, असेही कोर्टाने आपल्या निकालात  म्हटले. 

न्यायमूर्ती अनुप जयराम भांभानी यांनी निकाल देताना असे निरीक्षण नोंदवले की, गेल्या काही वर्षात शिक्षणात तंत्रज्ञानाची गरज वाढली असल्याने स्मार्टफोनवर पूर्णपणे बंदी घालणे 'अवास्तव' ठरेल. स्मार्टफोन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांशी जोडण्यात आणि त्यांच्या सुरक्षिततेत योगदान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. दिल्लीतील शाळेत स्मार्टफोनचा गैरवापर करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याशी संबंधित वादानंतर न्यायालयात खटला दाखल केला होता, त्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही काही निरि‍क्षणे नोंदवली आहेत. 

याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे, जेथे स्मार्टफोनच्या सुरक्षेची व्यवस्था करणे शक्य नाही तेथे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना त्यांचा स्मार्टफोन जमा करणे आणि घरी जाताना त्यांना तो परत देण्याची व्यवस्था असली पाहिजे. कोर्टाने सुचवले की वर्गांमध्ये स्मार्टफोनच्या वापरावर बंदी असली पाहिजे तसेच शाळा परिसर आणि शाळेचे वाहन यामध्ये स्मार्टफोनमधील कॅमेरा आणि रेकॉर्डिंगच्या सुविधेच्या वापरावर बंदी असली पाहिजे.

न्यायालयाने जारी केलेली प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे : 

शक्य असेल तिथे विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश करताना त्यांचे स्मार्टफोन जमा करावेत आणि दिवसाच्या शेवटी ते परत घ्यावेत. विद्यार्थ्यांनी कनेक्टिव्हिटी, सुरक्षिततेसाठी स्मार्टफोनचा वापर करावा, परंतु मनोरंजनासाठी नाही. शाळांनी विद्यार्थ्यांना जबाबदार ऑनलाइन वर्तन, डिजिटल शिष्टाचार आणि स्मार्टफोनच्या नैतिक वापराबद्दल शिक्षित केले पाहिजे. गैरवापराच्या बाबतीत, शाळा शिस्तभंगाचा उपाय म्हणून स्मार्टफोन जप्त करू शकतात.