बारावीतील अपयशानंतर नैराश्यात गेलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशक बाहेर काढणार
नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या बारावीचा निकाल सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यात काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, तर काहींना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांचे नकारात्मक विचार वाढीला लागून ते मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
काही दिवसांपूर्वीच इयत्ता बारावीचा निकाल (12th result) जाहीर झाला असून काही विद्यार्थी अनुउतीर्ण (Student failed) झाल्याने किंवा काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्यामुळे (Students get low marks) नकारात्मक विचार करतात. तसेच मानसिक तणावात येण्याची (To get out of depression) शक्यता असते अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच पुढील परीक्षेसाठी तयार करण्यासाठी (To prepare for the next exam,) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) पुढील आठ दिवस समुपदेशकांची नियुक्ती (Appointment of counselors) करण्यात आली आहे. हे समुपदेशक सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या बारावीचा निकाल सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यात काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, तर काहींना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांचे नकारात्मक विचार वाढीला लागून ते मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता आहे
मानसिक तणावाखाली विद्यार्थी चुकीचे पाऊल उचलू नयेत यासाठी राज्य मंडळाने परीक्षेचा निकाल जाहीर होताच अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी विभागीय स्तरावर ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळाकडून समुपदेशकांचे फोन नंबर जाहीर केले आहेत. ही सेवा निकालाच्या दिवसापासून सलग ८ दिवस सुरू राहणार आहे. समुपदेशक सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांना फोनद्वारे नि:शुल्क, आवश्यक ते समुपदेशन करणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. त्या परीक्षेतील यशानंतर त्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. तथापि, ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असा सल्ला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बारावीच्या परीक्षेत अपेक्षित यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिला आहे.
समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक : ९०११३०२९९७, ८२६३८७६८९६, ८७६७७५३०६९, ७३८७४००९७०, ९९६०६४४४११, ७२०८७७५११५, ८१६९२०२२१४, ९८३४०८४५९३, ८३२९२३००२२, ९५५२९८२११५