उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम बदलणार! यूजीसीने दिले निर्देश

यूजीसीने सर्व विद्यापीठांना अभ्यासक्रम सुधारणेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तसेच  संलग्न महाविद्यालयांद्वारे ऑफर केलेल्या सर्व कार्यक्रमांचे अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी, पुनरावलोकन करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी त्वरित पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम बदलणार! यूजीसीने दिले निर्देश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


 विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission) UGC देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये वेळेनुसार बदल करण्याचे आवाहन केले आहे. (Universities and colleges have been urged to make changes to their academic curricula in line with the times) आयोगाने म्हटले  आहे, "की शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसावे, तर त्यात व्यावहारिक अनुभव, जीवन कौशल्ये आणि विद्यार्थ्यांना 'करून शिकणे' यासारख्या घटकांचा समावेश असावा, जेणेकरून विषयाचा अनावश्यक भार कमी करता येईल आणि शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकेल.  वेगाने बदलणाऱ्या जगाच्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.'

यूजीसीने सर्व विद्यापीठांना अभ्यासक्रम सुधारणेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तसेच  संलग्न महाविद्यालयांद्वारे ऑफर केलेल्या सर्व कार्यक्रमांचे अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी, पुनरावलोकन करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी त्वरित पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
या दिशेने ठोस पाऊल उचलत, यूजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना एक पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, सर्व शैक्षणिक कार्यक्रमांचा अभ्यासक्रम NEP-2020 च्या शिफारशींनुसार तात्काळ सुधारित केला पाहिजे. या अभ्यासक्रमांमधील क्रेडिट फ्रेमवर्क आणि पात्रता रचना अशा प्रकारे डिझाइन केली पाहिजे की अप्रेंटिसशिप, इंटर्नशिप आणि कौशल्य विकासाला योग्य स्थान देता येईल.

यूजीसी सचिव मनीष आर. जोशी यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, 'जगात तंत्रज्ञान आणि नवोपक्रम प्रत्येक क्षणी बदलत आहेत, त्यामुळे शिक्षक आणि संस्थांनी काळासोबत स्वतःला अपडेट करणे महत्त्वाचे आहे. आपल्याला आजच्या आणि भविष्यातील आव्हानांनुसार नवीन पिढी तयार करावी लागेल.'

दरम्यान  शालेय शिक्षणात हा बदल आधीच सुरू झाला आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) अंतर्गत, शालेय स्तरावर अभ्यासक्रमात वेगाने बदल होत आहेत. अलिकडेच प्रकाशित झालेल्या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये विषयांची सामग्री कमी करण्यात आली आहे आणि विद्यार्थ्यांची कौशल्ये, जीवन व्यवस्थापन क्षमता विकसित करणे आणि सर्जनशील विचारसरणीला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे.