किरकोळ कारणावरून वाद, पालक आले; अन् झील शाळेच्या विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण
शाळा हे विद्यार्थ्यांसाठी दुसरं घर असतं असे म्हणतात. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार आणि जीवनाश्यक मूल्य शिकवली जातात. मात्र, अशाच एका शाळेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक आता समोर आला आहे. दुर्दैव म्हणजे हा सर्व प्रकार विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातच घडला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शाळा हे विद्यार्थ्यांसाठी दुसरं घर असतं असे म्हणतात. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार आणि जीवनाश्यक मूल्य शिकवली जातात. मात्र, अशाच एका शाळेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण (Inhuman beating of students) केल्याचा धक्कादायक आता समोर आला आहे. दुर्दैव म्हणजे हा सर्व प्रकार विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातच घडला आहे. पौड गावातील शाळेत (Paud village school) काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी इतर विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली आहे. या गंभीर प्रकारचा सीसीटीव्ही देखील आता समोर आला आहे. हा सीसीटीव्ही व्हिडिओ पौड (CCTV video paud) गावातील झील शाळेतील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता नववीत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता. हे प्रकरण शाळा प्रशासनाकडे गेले. शाळेने विद्यार्थ्यांना योग्य ती समज देऊन हे प्रकरण मिटवले. मात्र, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे इतर विद्यार्थ्यांबरोबर वाद झाले होते, त्यांचे पालक शाळेत आले. त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना बोलवण्यास सांगितले. हे विद्यार्थी समोर येताच पालकांनी आणि त्यांच्या सोबत आलेल्या मित्रांनी या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. अजित पिंगळे असे मारहाण करणाऱ्या पालकाचे नाव आहे. हा मारहाणीचा सर्व प्रकार शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.
हे पालक एवढ्यावरच थांबले नसून, तुम्ही बाहेर या तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील या विद्यार्थ्यांना देण्यात आली. हा सर्व प्रकार शाळेच्या आवारात घडला. मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बाब मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना समजताच त्यांनी पौड पोलीस स्टेशनला संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच शाळेत असा प्रकार होत असेल तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची असा संतप्त सवाल देखील या पालकांकडून शाळा प्रशासनाला करण्यात आला आहे.