NEET-UG मध्ये 11 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शून्य / निगेटिव्ह गुण
शहर आणि केंद्रनिहाय निकालात 2 हजार 250 उमेदवारांना शून्य गुण मिळाले आहेत. या शिवाय 9 हजार 400 उमेदवारांना निगेटिव्ह गुण (शून्य पेक्षा कमी)मिळाले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG च्या निकालानंतर एक खास बाब समोर आली आहे. यंदा 11 हजारांहून अधिक उमेदवारांना शून्य किंवा निगेटिव्ह गुण (Zero or negative marks)मिळाले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्यासोबत ही माहिती प्रसिध्द केली आहे. एनटीएच्या म्हणण्यानुसार राजस्थानमधील सीकरच्या केंद्रांवर (Centers of Sikar in Rajasthan)दोन हजारांहून अधिक उमेदवारांनी 650 हून अधिक गुण मिळवले आहेत. याशिवाय चार हजारांहून अधिक उमेदवारांना 600 हून अधिक गुण मिळाले आहेत. NEET-UG परीक्षेचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर जाहीर केला आहे.
एनटीएने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी जाहीर झालेल्या शहर आणि केंद्रनिहाय निकालात (City and Center wise results)2 हजार 250 उमेदवारांना शून्य गुण मिळाले आहेत. या शिवाय 9 हजार 400 उमेदवारांना निगेटिव्ह गुण (शून्य पेक्षा कमी)मिळाले आहेत. या शिवाय झारखंडच्या हजारीबाग येथील केंद्रावर परीक्षेला बसलेल्या अनेक उमेदवारांना शून्य गुण मिळाले आहेत. हजारीबागमध्येही NEET परीक्षेत अनियमिततेच्या तक्रारी आल्या होत्या. तथापि, अशी अनेक केंद्रे आहेत जिथे परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना शून्य गुण मिळाले आहेत.
NTA ने दिलेल्या महितीनुसार शून्य गुण म्हणजे विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत काहीही लिहिले नाही. ते म्हणाले, 'उमेदवारांनी काही प्रश्नांची उत्तरे बरोबर तर काही प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला निगेटिव्ह गुण मिळाले आहेत. NEET-UG परीक्षेत, प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुण दिले जातात आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो. NEET-UG परीक्षेत अनियमितता आणि पेपर फुटल्याच्या आरोपानंतर देशभरात चर्चा सुरू झाल्या होत्या. एनटीएने शनिवारी या परीक्षेचा शहर व केंद्रनिहाय निकाल जाहीर केला होता. त्यात शून्य पेक्षा कमी (मायनस)गुण मिळाले आहेत.
NTA च्या मते, डेटाच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की तथाकथित पेपर लीक आणि अनियमितता यांचा फायदा घेतलेल्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली नाही. याशिवाय काही परीक्षा केंद्रांवर चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.