रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू; पदवीधारकांना २ लाख तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ६ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य

रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती २०२६-२७ साठी अर्ज सुरू. ५,००० पदवी व १०० पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आर्थिक मदत; पात्रता व अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या.

रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू; पदवीधारकांना २ लाख तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ६ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

रिलायन्स फाऊंडेशनच्या (Reliance Foundation) प्रतिष्ठित शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी (Academic year 2026-27) अर्ज प्रक्रिया सुरू (Application process begins) झाली आहे. या माध्यमातून देशभरातील प्रथम वर्षातील ५,००० पदवी आणि १०० पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Scholarships for 5,100 students) दिली जाणार आहे. पदवी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीत २ लाख रुपयांपर्यंत, तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल. यासाठी अर्जाची अंतिम मुदत ५ ऑक्टोबर (Application deadline: October 5) २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. तर निकाल डिसेंबर २०२६ अखेर जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसोबत मार्गदर्शन, नेतृत्व विकास कार्यक्रम, उद्योग तज्ज्ञांशी संवाद आणि स्कॉलर समुदायाचा लाभही मिळेल. आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे. अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://scholarships.reliancefoundation.org/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. पदवी शिष्यवृत्तीसाठी भारतीय नागरिक, तसेच तो भारतात निवासी असणे आवश्यक आहे. बारावीत किमान ६० टक्के गुण मिळवून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या नियमित पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. २.५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य. पदव्युत्तरसाठी प्रथम वर्षातील नियमित पूर्णवेळ अभ्यासक्रम, विशेषतः इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि जीवन विज्ञान यांसारख्या भविष्याभिमुख विषयांत प्रवेशित विद्यार्थी पात्र आहेत. गेट परीक्षा ५५० ते १००० गुण किंवा पदवीत ७.५ किंवा त्याहून अधिक सीजीपीए असणे आवश्यक आहे. उत्पन्न मर्यादा नाही.

निवड प्रक्रिया कठोर आणि वस्तुनिष्ठ आहे. पदवीसाठी चार टप्पे आहेत: ऑनलाइन अर्ज व कागदपत्रे सादर करणे, अनिवार्य ६० मिनिटांची ऑनलाइन शाब्दिक, विश्लेषणात्मक आणि संख्यात्मक क्षमता चाचणी (अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट), कागदपत्रांची पडताळणी आणि अंतिम निवड. अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट स्कोर, शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती यांच्या आधारे मूल्यांकन केले जाते. पदव्युत्तरसाठी शैक्षणिक गुणवत्ता, अ‍ॅप्टीट्यूड आणि इतर निकषांसोबत आभासी मुलाखतींचा समावेश आहे.