MPSC उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना, 'प्रोफाईलची KYC' करण्याच्या तारखेत बदल

आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या खात्याची केवायची करण्याची कार्यपद्धती राबवण्यात येत आहे. त्यासाठी १५ जुलैपासून उमेदवारांना केवायसी करणे आवश्यक होते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या खात्याची केवायसी सुरू करण्याच्या दिनांकामध्ये बदल करण्यात येत असून, ही प्रक्रिया २५ जुलै २०२५ पासून सुरू करण्यात येणार असल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

MPSC उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना, 'प्रोफाईलची KYC' करण्याच्या तारखेत बदल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या अर्ज प्रणालीमधील खात्याची आधार व इतर पद्धतीने 'केवायसी' करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया १५ जुलैपासून राबवली जाणार होती, मात्र त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. आयोगाने विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी तसे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध (Press release published) केले आहे. त्यानुसार आता २५ जुलैपासून उमेदवारांना आपल्या प्रोफाईलची केवायसी करता येणार आहे. उमेदवारांनी प्रत्येक अर्ज भरण्यापूर्वी 'केवायसी' पडताळणी (Profile Aadhaar KYC) केली नाही, तर त्याला अर्ज भरता येणार नाही.

आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या खात्याची केवायची करण्याची कार्यपद्धती राबवण्यात येत आहे. त्यासाठी १५ जुलैपासून उमेदवारांना केवायसी करणे आवश्यक होते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या खात्याची केवायसी सुरू करण्याच्या दिनांकामध्ये बदल करण्यात येत असून, ही प्रक्रिया २५ जुलै २०२५ पासून सुरू करण्यात येणार असल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

TAIT परीक्षेच्या निकालाला विलंब का?; 'या' कारणामुळे ठेवला राखून

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार, उमेदवारांना आधार ऑनलाईन ई-केवायसी, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी, नॉन आधार ऑफलाईन केवायसी या पद्धतीतून ओळख पडताळणी करावी लागणार आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रमणालीमध्ये प्रथम नोंदणी करणाऱ्या उमेदवाराला भ्रमणध्वनी तसेच ईमेल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आधार आधारित ओळख पडताळणीच्या व्यवस्थेमुळे आधार क्रमांकाशी संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देणे अनिवार्य ठरविण्यात आले आहे.

अर्ज करण्याकरीता संबंधित उमेदवाराला प्रथम आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर विहित पध्दतीने एक वेळची नोंदणी करावी लागते. तसेच विहित पध्दतीने नोंदणीनंतर संबंधित खात्यामध्ये अर्हतेसंदर्भातील विविध प्रकारचा तपशील नोंदवावा लागतो. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणीकृत उमेदवारांच्या ओळख पडताळणीकरीता उमेदवारांच्या खात्यामध्ये आधार क्रमांक नोंदविण्याची पध्दती व सुविधा मार्च २०१७ पासून लागू करण्यात आली आहे.

भरती प्रक्रियांच्या विविध टप्प्यावर उमेदवाराचे प्रमाणीकरण करण्यासाठी स्वेच्छा तत्वावर आधार अधिप्रमाणीकरणाचा वापर करण्याकरीता विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) मान्यता दिली आहे. तसेच, राज्य शासनाकडून भरतीप्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्याकरीता ई-केवायसी सेवांसाठी स्वेच्छा तत्वावर आधार प्रमाणीकरणाचा वापर करण्यासाठी एमपीएससीने प्राधिकृत केले आहे.