फक्त गुणांमागे धावू नका, चौकस बना; सरन्यायाधीस गवई यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

कायद्याचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे शिक्षणव्यवस्थेत मोठा बदल झाल्याचे सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले. तरुण वकिलांचे कायद्याचे ज्ञान पाहून सरन्यायाधीशांनी कौतुक केले आणि अनुभवी वकिलांनीही त्यांच्याकडून शिकावे, असे ते म्हणाले. सरन्यायाधीश गवई यांनी कमी वेतन आणि इतर समस्यांवरही चर्चा केली.

फक्त गुणांमागे धावू नका, चौकस बना; सरन्यायाधीस गवई यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण फक्त गुण जास्त मिळवण्यामागे धावत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न धावत चौकस बनण्यावर भर द्यायला हवा, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई (Chief Justice Bhushan Gavai) यांनी केले. देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात असून, त्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्दीने वाटचाल करावी, असेही ते म्हणाले. ते पणजी येथील व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या (V. M. Salgaonkar Law College Panaji) सुवर्णमहोत्सवी समारंभात बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे (Chief Justice of Bombay High Court Alok Aradhe) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

NCDC मध्ये उच्च पदावर कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट भरती अन् लाखोंची पगार..

कायद्याचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे शिक्षणव्यवस्थेत मोठा बदल झाल्याचे सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले. तरुण वकिलांचे कायद्याचे ज्ञान पाहून सरन्यायाधीशांनी कौतुक केले आणि अनुभवी वकिलांनीही त्यांच्याकडून शिकावे, असे ते म्हणाले. सरन्यायाधीश गवई यांनी कमी वेतन आणि इतर समस्यांवरही चर्चा केली.

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सामाजिक बांधीलकी जपणारे उद्योजक व्ही. एम. साळगावकर यांनी गोव्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या महाविद्यालयाचे कौतुक केले. या संस्थेने गोव्याच्या न्यायव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे, असे ते म्हणाले.

सरन्यायाधीश गवई यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगितल्या. 'मी अनेकदा वर्ग चुकवायचो; पण माझे मित्र माझी वर्गात उपस्थिती लावायचे. मात्र, मी जेव्हा अभ्यास करायचो, तेव्हा पूर्ण एकाग्रतेने करायचो. यामुळे या स्थानापर्यंत पोहोचलो, अशा आठवणी सरन्यायाधीस भूषण गवई यांनी सांगितल्या.