CBSE पहिली ते बारावीच्या अभ्यासात छत्रपती शिवाजी महाराजांवर ६८ शब्दांचा धडा

अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाचा समावेश करण्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली असली, तरी सध्याच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांविषयी एक धडा आणि तोसुद्धा फक्त ६८ शब्दांमध्ये समाविष्ट करण्यात आला असून, हे धक्कादायक वास्तव नुकतंच समोर आलं आहे.

CBSE पहिली ते बारावीच्या अभ्यासात छत्रपती शिवाजी महाराजांवर ६८ शब्दांचा धडा

एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता पहिली ते बारावीच्या एकूण अभ्यासक्रमात (CBSE Syllabus for Class 1 to 12) छत्रपती शिवाजी महाराजांवर (History of Chhatrapati Shivaji Maharaj) केवळ ६८ शब्दांच्या समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींसह इतिहासकारांमध्ये तीव्र नाराजी (Strong displeasure among Shivpremi and historians) पसरली आहे. एवढ्या महान राजावर एवढं कमी लिखान असेल तर मग विद्यार्थ्यांनी शिवराय समजणार तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सीबीएससी कद्रुपणा लक्षात आला आहे. 

सीबीएसई अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांविषयी एक धडा आणि तोसुद्धा फक्त ६८ शब्दांमध्ये समाविष्ट करण्यात आला असून, हे धक्कादायक वास्तव नुकतंच समोर आलं आहे. सीबीएसईच्या देशपातळीवर शिकवल्या जाणाऱ्या इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकांची एकूण २,२०० पाने आहेत. या सव्वादोन हजार पानांपैकी मराठ्यांच्या इतिहासाला फक्त दोन पानांचेच महत्त्व देत तो अक्षरशः गुंडाळून टाकण्यात आला आहे.

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे त्यामध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन फक्त अकरा ओळींमध्ये करण्यात आलं असून, महाराजांबाबत केवळ ६८ शब्द पाठ्यपुस्तकात पाहायला मिळत आहेत. म्हणजेच, माध्यमिक शाळांमधील मुलांना शिवाजी महाराजांची माहिती केवळ ६८ शब्दांमध्येच सीबीएसईच्या पाठ्युपुस्तकांत महाराजांच्या आणि मराठ्यांच्या इतिसाहाला मिळालेली जागा पाहता या विरोधात मराठा संघटना आणि शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. ज्या विरोधात पत्रकार परिषद घेत तिथं यासंदर्भातील सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे.
_____________________________________________

सीबीएसईच्या पहिली ते बारावीतील अभ्यासक्रमात केवळ दोन पानांचा एक धडा आणि तोही केवळ ६८ शब्दांचा ठेवण्यात आलेला आहे. सीबीएसईचा पहlली ते  बारावीचा २ हजार २०० पानांचा अभ्यासक्रम आहे. लोक अभिमानाने सांगतात माझी मुलं सीबीएसई च्या शाळेत शिक्षण घेतात. परंतु, त्यांना  शिवाजी महाराज काय समजणार आहेत. पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज समजू नयेत असे इथले प्रशासन करत आहे, त्याचा हा दुर्दैवी पुरावा आहे. 

नामदेव जाधव, इतिहासकार