बारावीत 100 टक्के गुण मिळवणारी 'किमया'; दूसरा विद्यार्थी कोण ?

महाराष्ट्रातून केवळ किती विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत, एवढेच बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.कोणत्या विद्यार्थ्यांना हे गुण मिळाले हे सांगितले जात नाही. यंदा दोन विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले असले तरी किमयासह आणखी कोणाला 100 टक्के गुण मिळाले, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

बारावीत 100 टक्के गुण मिळवणारी 'किमया'; दूसरा विद्यार्थी कोण ?
12th board topper Kimaya Watile celebrating her 100% marks achievement, symbolizing academic excellence and student success.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत किमया वातीले या विद्यार्थीनीने 600 पैकी 600 गुण मिळवून राज्यात अव्वल क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे.मात्र, आणखी एका विद्यार्थाने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.मात्र, संबंधित विद्यार्थी कोण हे अद्याप समोर आलेले नाही. राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवल्याची माहिती दिली.मात्र,त्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यास नकार दिला, त्यामुळे किमया बरोबर राज्यात आणखी कोणी पैकीच्या पैकी गुण मिळवले ही माहिती गुलदस्त्यात आहे. 

किमया वातीले ही यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थीनी असून विज्ञान शाखेतून तीने बारावीची परीक्षा दिली होती. किमया जगदंबा कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थीनी असून तीने इंग्रजी, भूतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या विषयात 100 पैकी 100 आणि कम्प्युटर सायन्स या विषयात 200 पैकी 200 गुण मिळवल्याची माहिती समोर आली आहे. किमया ही जगदंबा इंजिनिअर कॉलेजचे सचिव डॉ. शीतल वातीले व ज्योती वातीले यांची कन्या आहे. 

किमया म्हणाली, सातत्य , शिस्त आणि अपार कष्ट हेच तुमच्या यशाचे गमक आहे. एका दिवसात तुम्हाला यश मिळत नाही तर पहिल्या दिवसापासून यश गाठण्यासाठी तयारी करावी लागले. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या गोष्टींपासून दूर राहावे लागेल.मित्र परिवारांपासून सुद्धा दूर राहावे लागेल.मोबाईल,सोशल मीडिया सोडावे लागेल, हे कठीण आहे.परंतु,यश मिळवण्यासाठी या तडजोडी कराव्या लागतील. 

दरम्यान, राज्य मंडळाने निकाल जाहीर करताना मेरिट लिस्ट देण्याचे बंद केले आहे.त्यामुळे महाराष्ट्रातून केवळ किती विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत, एवढेच बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.कोणत्या विद्यार्थ्यांना हे गुण मिळाले हे सांगितले जात नाही. यंदा दोन विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले असले तरी किमयासह आणखी कोणाला 100 टक्के गुण मिळाले, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय होत आहे.बोर्डाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता आम्ही सांगणार नाही, तुम्हाला हवे त्या ठिकाणाहून माहिती मिळवा,असे बोर्डाचे अधिकारी सांगत आहेत.