ZP Recruitment : एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास होईल नुकसान, वाचा महत्वाच्या सुचना...

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट-क मधील ३० संवर्गांतील एकूण १९ हजार ४६० इतकी पदांसाठी जाहिराती प्रसिध्द झाल्या आहेत.

ZP Recruitment : एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास होईल नुकसान, वाचा महत्वाच्या सुचना...
Zilla Parishad recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (Zilla Parishad Recruitment) भरण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट-क मधील ३० संवर्गांतील एकूण १९ हजार ४६० इतकी पदांसाठी जाहिराती प्रसिध्द झाल्या आहेत. पण असे असले तरी इच्छूकांना केवळ एका संवर्गासाठी केवळ एकाच जिल्हा परिषदेत अर्ज करता येणार आहे. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास केवळ शेवटी भरलेला अर्जच ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

इच्छूकांना २५ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारानी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक, जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.

Recruitment News : भरती परीक्षेत गैरप्रकार नाहीच; वन विभागाकडून मोठा दावा

भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. तसेच दोन अर्ज भरलेले असल्यास दुसरा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे एकाच जिल्हा परिषदेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस (IBPS) कंपनीमार्फत करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे अर्ज भरताना तसेच भरल्यानंतर उमेदवारांनी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. याबाबत आयबीपीएसकडून महत्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अर्ज भरताना असलेली शैक्षणिक पात्रताच नमूद करणे आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी कागदपत्रांची पडताळणी न करता प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पडताळणी होणार आहे.

परीक्षा घेणाऱ्या एजन्सीलाच ‘महाज्योती’कडून डच्चू; प्रवेश परीक्षांबाबत महत्वाची अपडेट

ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरल्याची पावतीची प्रिंट घेऊन उमेदवारांनी आपल्याजवळ ठेवावी. भविष्यात कोणत्याही अडचणी आल्यास त्याची गरज भासू शकते. ऑनलाईन परीक्षेच्या तारखेबाबत उमेदवारांनी सातत्याने जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पाहावे. ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तिथूनच ती डाऊनलोड करता येतील. माहितीपुस्तिकाही डाऊनलोड करून परीक्षेबाबतची माहिती वाचावी.

जिल्हा परिषद बदलू शकते परीक्षा केंद्र

जिल्हा परिषदांना परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्याचा अधिकार राहणार आहे. कोणतीही जिल्हा परिषद एखादे केंद्र रद्द करू शकते किंवा केंद्रांमध्ये आवश्यकतेनुसार वाढ करू शकते. उमेदवारांनी पर्याय म्हणून दिलेल्या केंद्रांव्यतिरिक्त झेडपीकडून इतरही केंद्र दिली जाऊ शकतात, असे आयबीपीएसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वयोमर्यादा शिथिल

 ज्या उमेदवारांनी मार्च २०१९ मधील जिल्हा परिषद जाहिरातीकरीता अर्ज केलेला होता व वयाधिक्य झाल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होत आहेत, अशा उमेदवारांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांनी मार्च २०१९ परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही, त्यांनाही कमाल वयोमर्यादेत २ वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD