शाळेतील मुलाच्या लैंगिक शोषण प्रकरणी पालकांसह सामाजिक संघटना आक्रमक
पुणे शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षकी पेसाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शाळेत डान्स शिकवणाऱ्या शिक्षकाने मुलावर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता पालकांसह सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षकी पेसाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शाळेत डान्स टिचरने मुलावर लैंगिक अत्याचाराची (Child sexual abuse) धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता पालकांसह सामाजिक संघटना आक्रमक (Social organizations are aggressive) झाल्या आहेत. या प्रकरणामुळे विविध संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. अशा प्रकरणाची राज्य सरकार आणि शिक्षण विभागाने (Department of Education) कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याची आग्रही मागणी संघटनांनी केली आहे.
राज्यांतील शाळांमध्ये दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराचा आलेख वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या घटनांना चाप कधी बसणार आहे. असा संतप्त सवाल विविध संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून आता शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली पाहिजेत. याबाबत राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे योग्य ते धोरण ठरविणे आवश्यक आहे. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले आहेत.
शाळांमध्ये या उपाययोजना असाव्यात
शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमितपणे चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाची आणि वाहकांचीदेखील पोलिस तपासणी करणे बंधनकारक असले पाहिजे. शाळांमधील 'सीसीटीव्ही' चे नियंत्रण करणारी व्यवस्था आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मोकळेपणे बोलता येईल, अशी व्यासपीठे उपलब्ध करून द्यावीत. शाळांमधील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेळोवेळी मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी होणे करणे, हे राज्य सरकारने सक्तीचे करावे. शाळा प्रशासनाने बदनामीचा विचार न करता अशा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःहून संबंधितांवर कारवाईसाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशा मागण्या संघटनांकडून करण्यात येत आहेत.
__________________________________
शाळेतील मुलांवर होणारा लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पालकांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे. कर्वेनगर येथील शाळेत जो काही प्रकार झाला आणि ज्या मुळे तो उघडकीस आला. त्यातून एकच गोष्ट लक्षात आली की हल्लीच्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद संपत चाललेला आहे. तो संवाद टिकून ठेवण्याची जबाबदारी ही फक्त शाळेची नसून पालकांची देखील आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांशी प्रेमाने आणि विश्वासाने संवाद साधून त्यांना बोलते करणे गरजेचे झालेले आहे.
- दिलीप सिंग विश्वकर्मा, महापेरेंट्स पालक संघटना