हैदराबाद विद्यापीठात संघर्ष, शेकडो विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
तेलंगणातील हैदराबाद विद्यापीठ जवळील जमिनीवर सरकारकडून करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईमुळे पोलीस आणि विद्यार्थी यांच्यामध्ये काही वेळ संघर्ष पाहायला मिळाला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
तेलंगणातील हैदराबाद विद्यापीठाजवळील (University of Hyderabad) जमिनीवर सरकारकडून करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईमुळे पोलीस आणि विद्यार्थी (Clashes between police and students) यांच्यामध्ये काही वेळ संघर्ष पाहायला मिळाला. विद्यापीठाजवळील ४०० एकर जमीन (400 acres of land) साफ करणाऱ्या पथकाला विरोध केल्यामुळे पोलिसांनी शेकडो आंदोलक विद्यार्थ्यांना काही काळ (Students arrested) ताब्यातही घेतले. या सर्व प्रकरणावर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, हैदराबाद विद्यापीठ परिसरात सरकारची ४०० एकर जमीन आहे. या जंगली जमिनीत हजारो झाडे आणि पशुपक्षी आहेत. या जमिनीचा विकास करण्याचा आणि तिथे आयटी पार्क उभारण्याची योजना सरकारची आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरणीय चिंता व्यक्त करत आयटी पार्क उभारण्याच्या निर्णयाविरुद्ध निषेध करत त्याला विरोध केला.
हैदराबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने एक पत्रकार परिषदे घेऊन आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याबद्दल स्थानिक सरकारवर जोरदार टीका केली. विद्यापीठाने म्हटले आहे की, लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार विद्यार्थी त्या घटनेचा निषेध करत असताना त्यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले. शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला.
पोलिसांच्या अहवालानुसार, अटक केलेले व्यक्ती एबीव्हीपी आणि एसएफआय विद्यार्थी संघटनांशी संबंधित आहेत. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की निदर्शक विद्यार्थ्यांनी हिंसाचार केला, अधिकारी आणि कामगारांवर काठ्या आणि दगडांनी हल्ला केला. या चकमकीत माधापूर विभागातील सहाय्यक पोलिस आयुक्तांना गुडघा आणि घोट्याला गंभीर दुखापत झाली.
विद्यार्थी संघटनेच्या निवेदनातून त्यांच्याशी विश्वासघात केल्याची भावना अधोरेखित झाली. विद्यार्थ्यांच्या मते, हा विश्वासघात विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा किंवा विद्यापीठाच्या दीर्घकालीन हिताचा विचार न करता राज्य सरकारच्या प्रकल्पांसाठी जमीन मंजूरीची सुविधा प्रशासनाने दिल्यामुळे झाला आहे. या कृत्यामुळे केवळ शैक्षणिक वातावरण बिघडले नाही तर विद्यापीठाच्या जमिनीची अखंडता देखील धोक्यात आली आहे,असा त्यांचा दावा आहे.