ना परीक्षा ना मुलाखात थेट नोकरी; पोस्टात १० वी उत्तीर्णांसाठी २८,००० पदांची मेगाभरती

या भरती मोहिम देशभरातील एकूण २३ पोस्टल सर्कल्समध्ये राबवली जात आहे. यामध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM)या पदांचा समावेश आहे. यासाठी उमेदवाराचे किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल 40 वर्षांपर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नोकरी भरती नियमांनुसार वयात सवलत देण्यात येणार आहे. 

ना परीक्षा ना मुलाखात थेट नोकरी; पोस्टात १० वी उत्तीर्णांसाठी २८,००० पदांची मेगाभरती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय टपाल विभागाने (Indian Postal Department) इयत्ता दहावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी तब्बल २८ हजार ७४० रिक्त पदांसाठी मेगाभरतीची (Mega recruitment for 28,740 posts) जाहिरात प्रसिद्ध करण्यात (The recruitment process has begun) आली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात येणार नाही तर थेट नोकरीची संधी दिली जाणार आहे. ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी (Gramin Dak Sevak (GDS) Post recruitment) ही भरती असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना भारतीय पोस्टाचे अधिकृत संकेतस्थळ https://www.indiapost.gov.in/ वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल. 

या भरती मोहिम देशभरातील एकूण २३ पोस्टल सर्कल्समध्ये राबवली जात आहे. यामध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM)या पदांचा समावेश आहे. यासाठी उमेदवाराचे किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल 40 वर्षांपर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नोकरी भरती नियमांनुसार वयात सवलत देण्यात येणार आहे. 

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना मोठा फायदा होणार आहे.
भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे आणि त्याला सायकल चालवता आली पाहिजे, अशी अट ठेवण्यात आली आहे. 

या भरतीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची निवड पद्धत. उमेदवारांची निवड करण्यासाठी कोणतीही स्पर्धा परीक्षा घेतली जाणार नाही. निवड केवळ १० वीच्या गुणांच्या आधारे (Merit Basis) उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. ज्यांना १० वीत चांगले गुण आहेत, त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ही नोकरीची मोठी संधी चालून आली आहे, असे म्हणावे लागले.