राज्यात ७० हजार पदांची भरती होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा 

यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २० हजार पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

राज्यात ७० हजार पदांची भरती होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात (Service Access Rules Amendment) बैठक झाली. या बैठकीत राज्यात लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबवली जाणार (Recruitment process will be implemented) आहे. सुमारे ७० हजारांहून अधिक पदांची भरती (Recruitment of more than 70 thousand posts) टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याची घोषणा फडणवीस यांची केली. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी दिलासा मिळणार आहे. 

हेही वाचा - ना परीक्षा ना मुलाखात थेट नोकरी; पोस्टात १० वी उत्तीर्णांसाठी २८,००० पदांची मेगाभरती

यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २० हजार पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.

राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात कोणत्याही विभागाने मागे न राहता सर्वांनी एकत्र येत प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

_______________________________________________________________

राज्यात तीन लाख विविध विभागात पदे रिक्त आहेत, ही पदे तातडीने भरली तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना  दिलासा मिळेल. राज्यात दिवसांदिवस बेरोजगारी वाढत आहे,  अनेक विभागात कमी मनुष्यबळ असल्यामुळे तिथं सर्वसामान्य नागरिकांची कामे राखडत  आहेत. 

महेश घरबुडे, अध्यक्ष स्पर्धा परीक्षा  विध्यार्थी असोसिएशन