अग्नीवीर भरतीच्या वयोमर्यादेत बदल, आता 'या' वयातील उमेदवारांनाही करता येणार अर्ज

उमेदवारांची बऱ्याच वर्षापासून वयोमर्यादा वाढवण्याची मागणी होती. पूर्वीची कमाल वयोमर्यादा २१ वर्षे होती, परंतु यावेळी ती २२ वर्षे करण्यात आली आहे, म्हणजेच १७.५ ते २२ वयोगटातील तरुण या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमर्यादा १ जुलै २०२६ पासून मोजली जाईल. त्यानुसार, उमेदवारांचा जन्म १ जुलै २००५ ते १ जुलै २००९ दरम्यान झालेला असावा, अशाच उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. 

अग्नीवीर भरतीच्या वयोमर्यादेत बदल, आता 'या' वयातील उमेदवारांनाही करता येणार अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारतीय सैन्यात सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्याने अग्निवीर भरतीसाठी (Agnivir Bharti 2026) अर्ज प्रक्रिया सुरू (Application process begins) केली आहे आणि देशभरातील विविध भरती केंद्रांवर तरुणांकडून अर्ज मागवले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी भरती नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे अधिक तरुणांना भारतीय सैन्यात सामील होण्याची संधी मिळणार. यामध्ये सर्वातम मोठा अडथळा ठरणारी वयोमर्यादेची अटी (Age limit conditions change) असते. त्यामुळे सैन्यात भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न अर्धवट राहतात. पूर्वी कमाल वयोमर्यादा ही २१ वर्षे होती, मात्र आता ती वाढवून २२ वर्षापर्यंत (Maximum age limit 22 years) करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.

उमेदवारांची बऱ्याच वर्षापासून वयोमर्यादा वाढवण्याची मागणी होती. पूर्वीची कमाल वयोमर्यादा २१ वर्षे होती, परंतु यावेळी ती २२ वर्षे करण्यात आली आहे, म्हणजेच १७.५ ते २२ वयोगटातील तरुण या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमर्यादा १ जुलै २०२६ पासून मोजली जाईल. त्यानुसार, उमेदवारांचा जन्म १ जुलै २००५ ते १ जुलै २००९ दरम्यान झालेला असावा, अशाच उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. 

अग्निवीर भरती २०२६ साठी अर्ज ऑनलाइन करता येतील. इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२६ आहे. जर तुम्ही भारतीय सैन्यात सेवा करण्याचे स्वप्न पाहत असाल तर लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

अग्निवीर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

अग्निवीर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता भरतीच्या प्रकारानुसार बदलते. अग्निवीर जनरल ड्यूटी (जीडी) साठी, उमेदवारांनी किमान ४५ टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान ३३ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अग्निवीर टेक्निकलसाठी, उमेदवारांनी भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपरसाठी एकूण परीक्षेत किमान ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण आणि इंग्रजी आणि गणित/अकाउंट्समध्ये किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ८ वी किंवा १० वी उत्तीर्ण झालेले उमेदवार अग्निवीर ट्रेड्समनसाठी अर्ज करू शकतात, प्रत्येक विषयात किमान ३३% गुणांसह. महिला मिलिटरी पोलिस (जीडी) साठी, किमान ४५% गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंटसाठी, उमेदवार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.