मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात तब्बल 1082 पदांची भरती

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयासाठी दुसऱ्या टप्प्यातील 1082 पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यासाठी लवकरच नव्याने भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 

मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात तब्बल 1082 पदांची भरती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण आणि पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करुन मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय (Mira Bhayander Vasai Virar Police Commissionerate) निर्माण करण्यास मान्यता दिल्यानंतर आता पद भरतीस मान्यता (Approval of post recruitment) देण्यात आली आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयासाठी दुसऱ्या टप्प्यातील 1082 पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यासाठी लवकरच नव्याने भरती प्रक्रिया राबवली जाणार (Recruitment process will be implemented) आहे. या संदर्भात शासन निर्णय जाहीर (Government decision announced) करण्यात आला आहे. 

राज्य सरकारने नव्याने 1082 पदे भरण्यासाठी मंजूरी दिल्यामुळे आता राज्यात लवकरच पोलीस भरती सुरू होईल. त्यामुळे पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तरुणांनो तयारीला लागा… कोणत्याहीक्षणी भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकरिता शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील एकूण 1082 नियमित पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. 

मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी पहिल्या टप्प्यात 1022 पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 1082 पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पोलिसिंग आणखी भक्कम होणार असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल आणखी सक्षम होईल. या नव्या पदनिर्मितीसाठी सुमारे 62 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. 2019 मध्ये मुख्यमंत्री असताना या पोलीस आयुक्तालयाची निर्मिती आम्ही केली होती, अशी पोस्ट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केली आहे.