मोठी बातमी: TET पेपर फूटी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांचे पथक पुण्यात आले; पुढे काय घडले....
23 नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेचा संचही परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी ताब्यात घेतला.परीक्षा परिषदेचे अध्यक्ष व आयुक्त यांच्याकडून परीक्षेची माहिती जाणून घेतल्यानंतर पाथक निघून गेले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षक पात्रता परीक्षा (teacher eligibility test)अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर (TET exam paper)फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police)ताब्यात घेतले.त्यानंतर शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ उडाली.आता पोलिसांकडून पुढील तपास केला जात असून बुधवारी पोलिसांच्या एका पथकाने पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयाला (Maharashtra State Examination Council Office in Pune)भेट देऊन याबाबत परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे प्रश्नपत्रिकेच्या छपाईबाबत चौकशी केली.तसेच परीक्षा कोणत्या पध्दतीने घेतली जाते,याबाबत माहिती जाणून घेतली,असे कोल्हापूर येथील पोलीस प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.परंतु, पोलिसांनी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला पकडले आहे,या टोळीकडे टीईटी परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका सापडली नाही.त्यामुळे पेपर फुटला असा दावा (Claim that the paper burst) करता येणार नाही,असे बोलले जात आहे.
महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षा घेतली जाते.त्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील प्रत्येक शिक्षकाला टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक झाले आहे.त्यामुळे या वर्षी गेल्या वर्षांच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत सुमारे सव्वा लाखाने वाढ झाली.त्यात परीक्षेच्या आधी एक दिवस कोल्हापूरमध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली.तब्बल तीन लाख रुपयांना ही प्रश्नपत्रिका विकली जाणार होती. तसेच त्यासाठी परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांकडून पैसेही घेतले गेले होते.याबाबत पकडलेल्या आरोपींनी कबुली दिली असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.त्यामुळेच या प्रकरणचा पुढील तपास केला जात आहे.त्यासाठीच कोल्हापूर पोलिसांचे एक पाथक बुधवारी पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात येऊन गेले.
परीक्षा परिषदेकडून ही प्रश्नपत्रिका कोणाला छापण्यासाठी दिली जाते.या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रापर्यंत कक्षा पोहचवल्या जातात.प्रश्नपत्रिका छापणारी आणि परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका पोहचवणारी गोपणीय संस्था कोणती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या पथकाने केला.तसेच 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेचा संचही परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी ताब्यात घेतला.परीक्षा परिषदेचे अध्यक्ष व आयुक्त यांच्याकडून परीक्षेची माहिती जाणून घेतल्यानंतर पाथक निघून गेले.
टीईटी परीक्षेचा पेपर फुटला का ?
पोलिसांचे पथक पुण्यात येऊन गेले. तसेच या पथकाने प्रश्नपत्रिकेचा संचही ताब्यात घेतला.जर पोलिसाकडे पेपर फोडण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेचा संच उपलब्ध असता तर दोन्ही संच समोरासमोर ठेऊन काही वेळातच पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले असते. मात्र, पोलिसांनी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले आहे. या टोळीला टीईटी परीक्षेचा पेपर मिळणार होता.त्यापूर्वीच या टोळीला पोलिसांनी अटक केली.त्यामुळे पेपर फुटल्याचे सिध्द कसे करणार? असा प्रश्न निर्माण होतो.तसेच राज्य परीक्षा परिषदेने या पूर्वी झालेल्या टीईटी परीक्षेच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत पारदर्शक व गोपनीय परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते.प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते.तसेच छपाई करणाऱ्या गोपनीय संस्थेकडून आलेल्या प्रश्नपत्रिका थेट परीक्षा सुरू होण्यापूर्वीच परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसामोरच उघडली जाईल,याची काळजी घेतली होती.त्यामुळे पकडण्यात आलेल्या टोळीला प्रश्नपत्रिका कुठून मिळणार होती, या संशोधनाचा विषय आहे.