१९ वर्षांच्या निसर्गने सीबीएसईची सिस्टीम उघडी पाडली, आयआयटी कानपूरने थेट नोकरी दिली!

निसर्गने फेब्रुवारीत CERT-In ला याची माहिती दिली आणि मे महिन्यात आपल्या ब्लॉगवर सगळी डिटेल्स लिहिली. या बातमीनंतर आयआयटी कानपूरचे डायरेक्टर प्रो. मणिंद्र अग्रवाल यांचे लक्ष वेधले गेले. आणि आता निसर्गला थेट पूर्णवेळ नोकरी देण्यात आली आहे.

१९ वर्षांच्या निसर्गने सीबीएसईची सिस्टीम उघडी पाडली, आयआयटी कानपूरने थेट नोकरी दिली!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवी दिल्लीचा १९ वर्षांचा निसर्ग अधिकारी (Nisarga Adhikary) हा मुलगा फक्त बारावी पास झाला आहे. पण त्याने जे काम केले ते पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board Exam) परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या ऑन स्क्रीन मार्किंग (On Screen Marking) प्रणालीत गंभीर सुरक्षा कमकुवतता असल्याचे त्याने शोधून काढले. मास्टर पासवर्ड साध्या मजकुरात (plain text) ठेवलेला होता, ओटीपी चेकिंग सिस्टीमही कमकुवत (The OTP verification system is also weak) होती आणि कोणीही सहज घुसून विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल करू शकला असता.

निसर्गने फेब्रुवारीत CERT-In ला याची माहिती दिली आणि मे महिन्यात आपल्या ब्लॉगवर सगळी डिटेल्स लिहिली. या बातमीनंतर आयआयटी कानपूरचे डायरेक्टर प्रो. मणिंद्र अग्रवाल यांचे लक्ष वेधले गेले. आणि आता निसर्गला थेट पूर्णवेळ नोकरी देण्यात आली आहे. तो C3iHub या आयआयटी कानपूरच्या सायबर सुरक्षा संशोधन केंद्रात ओपन सोर्स इंटेलिजन्स (OSINT) आणि थ्रेट इंटेलिजन्स इंजिनिअर म्हणून काम करणार आहे. निसर्गकडे कोणतीही इंजिनिअरिंगची डिग्री नाही. तरीही त्याच्या व्यावहारिक ज्ञानाने आणि जबाबदाररीत्या (ethical hacking) कमकुवतता दाखवण्याच्या पद्धतीने त्याला ही संधी मिळाली.

तो आत्तापर्यंत आयआयटीत काम करणारा सर्वात तरुण कर्मचारींपैकी एक आहे. आयआयटीने दिलेली पगार चांगली आहे, पण निसर्गच्या अपेक्षेपेक्षा थोडी कमी असल्याचे सांगितले जाते. तरीही तो खूप आनंदी आहे. आधीही त्याने काही प्रकल्पांवर काम केले होते आणि डॉलरमध्ये पैसे कमावले होते. ही घटना फक्त एका मुलाची यशोगाथा नाही. ही गोष्ट दाखवते की आजकाल फक्त डिग्री पुरेशी नाही, खरी प्रतिभा, मेहनत आणि प्रॅक्टिकल स्किल्स महत्त्वाची आहेत.

आयआयटी कानपूर आता जुलै २०२६ पासून सायबर सुरक्षा विषयात नवीन बॅचलर प्रोग्राम सुरू करणार आहे, ज्यात JEE ऐवजी हॅकॅथॉनमधून प्रवेश मिळेल. निसर्गसारखे तरुण पाहून इतर मुलांना प्रेरणा मिळेल. परीक्षेच्या ताणात असताना किंवा नोकरीच्या शोधात असतानाही, आपल्या आवडीच्या क्षेत्रात मेहनत केली तर मोठी संधी मिळू शकते, हे या यशाने सिद्ध केले आहे. निसर्ग आता देशाच्या सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी काम करत आहे. खरोखर, दिमाग चालवला तर डिग्रीशिवायही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात