पेसा नोकरभरती विरोधात हजारो बेरोजगार तरुणांचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
हातात काळे झेंडे घेऊन पालघरच्या हुतात्मा चौकापासून सुरू झालेला धडक मोर्चाची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर संपला. यावेळी जिल्हाधिकाऱ्याला विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. मागण्या मान्य नाही झाल्यास कडक इशारा देखील देण्यात आला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पालघर जिल्ह्यात पेसा नोकर भरती (Pesa Recruitment) 100% आदिवासींना आरक्षण दिले देण्यात आले आहे. मात्र, बिगर आदिवासी कंत्राटी शिक्षकांची भरती (Recruitment of Contract Teachers) आदिवासी भरती प्रमाणेच करावी. या मागणीसाठी आरक्षण हक्क बचाव समितीच्या (Reservation Rights Protection Committee) नेतृत्वात बिगर आदिवासी बेरोजगार तरूणांसह नागरीकांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर (Palghar District Collector's Office) धडक मोर्चा काढला.
पेसा भरती प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील 52 टक्के पेक्षा अधिक असलेल्या बिगर आदिवासी समाजावर अन्याय झाल्याच्या विरोधात या मोर्चाच आयोजन करण्यात आल होत . या मोर्चात मोठ्या प्रमाणावर तरुणांसह महिलांनी देखील सहभाग घेतला असून सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची पायमलणी केल्याचा आरोप यावेळी मोर्चेकरीनकडून करण्यात आला .
लवकरच याबाबत सरकारने या मोर्चाची दखल न घेतल्यास येत्या काळात पालघर आणि ठाणे नव्हे तर राज्यातील 13 पेसा जिल्ह्यांमध्ये बिगर आदिवासी समाज एक वाटेल असा इशारा यावेळी मोर्चाच्या आयोजकांकडून देण्यात आला. हातात काळे झेंडे घेऊन पालघरच्या हुतात्मा चौकापासून सुरू झालेला धडक मोर्चाची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर संपला. यावेळी जिल्हाधिकाऱ्याला विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. मागण्या मान्य नाही झाल्यास कडक इशारा देखील देण्यात आला आहे.