'अशा' गुन्ह्यात सापडलात तर आयुष्य संपलं म्हणून समजा; पोलिसांचा विद्यार्थ्यांना इशारा
पुणे शहराच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि नागरिकांची पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषता युतकांची, कारण ते देशाचे भविष्य आहेत. त्यांचे चरित्र उत्तम असून जीवनाला शिस्त असल्यास गुन्हेगारी घडणार नाही. परंतु ते ड्रग्स, गांजा, दारू इतर मादक पदार्थांचे सेवन यांसारख्या व्यसनांत स्वतःला अडकवून स्वतः सह कुटुंबीयांचे नुकसान करताना दिसतात. देशातील सर्वात सुरक्षित शहर असलेल्या पुण्यात महिलांनी स्वतची लक्ष्मण रेषा आखून घ्यावी, असे अमितेश कुमार म्हणाले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांनी अमली पदार्थाचे सेवन, व्यसन व वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून स्वक्तला दूर ठेवले पाहिजे. फ्रेशर्स पार्टीपासून दूर राहून करिअर घडवा. युवती व महिलांनी लक्ष्मण रेखा समजून घ्या. पोलिसांना कोणाचेही करिअर बरबाद करायचे नसते, परंतु ड्रग्स आणि अमली पदार्थांच्या गुन्ह्यात (Drugs and narcotics offenses) १०० पैकी ५ जरी विद्यार्थी पकडले गेले तर त्यांचे आयुष्य नंतर संपले म्हणूनच समजा, असा इशारा पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच नवयुवकांना आवाहन केले की, असा व्यवसाय करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांची संपूर्ण गोपनीयता पुणे पोलिस ठेवतील. सेवा, धैर्य आणि वचनबद्धतेला सर्मपित असणाऱ्या 'महाराष्ट्र पोलिस स्थापनदिना (Maharashtra Police Foundation Day) 'निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (MIT World Peace University) स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला शहरातील जवळपास १ हजार पेक्षा अधिक शाळा आणि कॉलेजमधील जवळपास ५ लाख विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने जोडले गेले होते.
हेही वाचा - स्टाप सिलेक्शन कमिशन २०२६ संभाव्य परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
पुणे शहराच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि नागरिकांची पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषता युतकांची, कारण ते देशाचे भविष्य आहेत. त्यांचे चरित्र उत्तम असून जीवनाला शिस्त असल्यास गुन्हेगारी घडणार नाही. परंतु ते ड्रग्स, गांजा, दारू इतर मादक पदार्थांचे सेवन यांसारख्या व्यसनांत स्वतःला अडकवून स्वतः सह कुटुंबीयांचे नुकसान करताना दिसतात. देशातील सर्वात सुरक्षित शहर असलेल्या पुण्यात महिलांनी स्वतची लक्ष्मण रेषा आखून घ्यावी, असे अमितेश कुमार म्हणाले.
सोशल मीडियापासून सांभाळल्यास ९० टक्के समस्या सुटतील, तरी कोणतीही घटना घडल्यास पोलिसांना तत्काळ सूचित करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑनलाइन गेमिंग, ई-मेल फसवणूक आणि सोशल नेटवर्क प्रोफाइलशी छेडछाड, ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे ते म्हणाले. रंजनकुमार शर्मा यांनी, नशेच्या आहारी जाणारा युवा वर्ग हा शेवटी आत्महत्येपर्यंत पोहोचत आहे. तसेच सायबर गुन्हे, नार्को, आर्थिक फसवणूक, वाहतूक समस्या आणि कायद्याचे पालन न करणाऱ्या घटना वाढत आहेत. शहरात क्योवृद्धांना केंद्रित करून त्यांना डिजिटल अरेस्ट करून पैशांची मागणी होताना दिसत आहेत. अशा वेळेस गुन्हेगारीला अंकुश लावण्यासाठी नागरिकांनी ११२ या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.