यंदा पाचवी ,आठवी बरोबर चौथी, सातवीची देखील शिष्यवृत्ती परीक्षा होणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
ग्रामीण भागात बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी शाळा या चौथी अथवा सातवीपर्यंत आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात नसल्याने विद्यार्थी, पालकांसह शाळांना याचा मोठा फटका बसत होता. परिणामी या शाळांतील विद्यार्थी संस्था पटसंख्या घटत चालले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
चालू शैक्षणिक वर्ष (२०२५-२६) (Academic year 2025-26) मध्ये पाचवी आणि आठवी बरोबर चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची देखील शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Education Minister Dada Bhuse) यांनी केली आहे. बहुसंख्य शाळेतील शिक्षक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतात. मात्र, शासनाने बदल केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही शाळांमधील चौथी व सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळत नव्हती. काही शिक्षक संघटनांनी चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship exam for 4th and 7th grade students) घेण्याची मागणी केली होती. त्याबाबत प्रस्ताव शासन सादर करण्यात आला होता.त्यानंतर आता खुद्द शिक्षणमंत्र्यांनी घोषणा केल्याने लवकरच याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केल्या जाण्याची शक्यता आहे.
शिक्षण विभागात गोंधळ : अचानक सुट्टी जाहीर केल्याने पॅट परीक्षेचे वेळापत्रक कोडमडले
ग्रामीण भागात बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी शाळा या चौथी अथवा सातवीपर्यंत आहेत. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देता येत नव्हती. विद्यार्थी, पालकांसह शाळांना याचा मोठा फटका बसत होता. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व आठवीसाठी घेतली जात असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संसंख्येत दिवसेंदिवस घट होत चालली होती. २०१६ पासून पाचवी व आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा मोठा फटका स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी प्राथमिक शाळांना बसला. या बदलामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या घटत चालली असल्याचे प्राथमिक शिक्षक संघटनांनी शिक्षणमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मंत्री भुसे यांनी चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे घोषित केले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम मिळत नाही.त्यामुळे त्यात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी गोदिया येथील एका कार्यक्रमात सांगितले.आता लवकरच पुन्हा दरवर्षी केवळ चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.