समाजात जीवन मूल्ये भारतीय राज्यघटनेमुळे रुजली
संविधान दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीची राज्यघटना" या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संदानशिवे बोलत होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव, मानवता ही जीवन मूल्ये भारतीय राज्यघटनेमुळे समाजात रुजली आणि या करिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपार कष्ट करावे लागले, असे मत संविधानाचे अभ्यासक तथा कायदा आयोगाचे सदस्य डॉ. डी. एन.संदानशिव यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठत संविधान दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीची राज्यघटना" या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संदानशिवे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते. तसेच या प्रसंगी विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री रवींद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. संगीता जगताप, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुधाकर बोकेफोडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले उपस्थित होते.
युवकानी संविधानचा जागर करावा. लोकशाहीमूल्ये वृंदिगत करावेत,असे आवाहन करून संदानशिव यांनी संविधान निर्मितीतील महत्त्वाच्या नोंदी, जगातील इतर देशांचे संविधान आणि भारतीय संविधान त्याचे वेगळेपण अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यापीठातील प्राध्यापक, विविध अधिकार मंडळाचे पदाधिकारी, अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी केले. सूत्रसंचालन श्री स्वामीराज भिसे यांनी केले. तर डॉ. सुधाकर बोकेफोडे यांनी आभार मानले.